Saturday, November 2, 2013

आयुष्याची संध्याकाळ 

संसाराच्या रहाटगाड्यात 
तारुण्य हरवल्याचे कळलेच नाही, 
वृद्धापकाळाच्या वाटेने जाणारे पाऊल 
तारुण्याकडे परत फिरलेच नाही...। 
माझंच रक्त होऊ लागलं होतं 
माझ्यापासून आता विभक्त, 
आदर आणि नातं केवळ 
नावारूपाला उरले फक्त...।। 
एकेकाळचा तो थाट-माट 
हसतो आज आमच्यावरी, 
रक्तानेच वाळीत टाकलं 
का रुसावे जगावरी...।। 
जीर्ण शरीराला मनही विटले 
विटला आता सारा परिवार, 
आयुष्याच्या या विदारक सत्याला 
कोण कसे नाकारणार...।। 
मानवाच्या स्वार्थीपणाची 
आज सांगतो तुम्हाला गंमत, 
अहो, चलती असे तोवरच 
माणसाला असते किंमत...।।