Monday, December 6, 2010

Just Beautiful ....

Cherry
Blossoms Japan




Tundra



Autumn in Germany



The beauty of Antarctica



Saltzburg Austria - the most
beautiful city we have ever seen.





Neuschwannstein, King Ludwig's Castle
in Bavaria , Germany





Windmills of Holland



Beauty of Tibet



Golden Maple Leaf



Disney Castle



Edge of Glacier



Lavender Farm



The Night Scene of Eiffel Tower



Blue Sea



Earthbound Rainbow


Mirror Lake



Lavender at the Foot of the Mountain



Comet (Make a wish)



The Purple Romance



Breithorn Peak ( Switzerland )



Deep Autumn



The Moon and Star on Earth

COLORS of INDIA!.....Some amazing snaps !!


















































आयुष्य फार सुंदर आहे !!


आयुष्य फार सुंदर आहे! ..

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की ...
निवृत्त झालो की ...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.


खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?


जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा .

शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -

१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?

हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.

आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.

क्षणभर विचार करा .
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल ? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं , त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....

आता एक गोष्ट... काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.

पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.

धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...

" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?'' मग सा-यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.

ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले . उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का?

कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते. आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही... मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ?

जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा. आभारी आहे.

- विनायक

व्हिसा !!




व्हीसा स्टॅंप झाल्यावरती एकच धावपळ उडून गेली
भावितव्याच्या स्वप्नानी रे तहान भूक हरवून गेली
भेटी झाल्या, खरेदी झाली, बॅगसुद्धा भरुन झाली,
सारख़्या सूचना देता-देता आईची धांदल उड़ून गेली,
तासामागून तास गेला अन् फ्लाइटची वेळ जवळ आली,
निरोप द्यायला सवंगड्यांनी गर्दी केली,
कौतूक आणि काळजी बाबाच्या चेह-यावर दिसुन गेली,
पाठ फिरता तुझी, त्यांची पापणी सारं बोलून गेली,
अरे आपली माती आपली माणसं देश आपला विसरु नको,
सीलिकॉन वॅलित जा पण सह्याद्रीला विसरु नको,

विमान उडालं तेव्हा एक-एक डोळा पाण्यानं भरला असेल,
नकोच ज़ायला परदेशात एकदा नक्कीच वाटल असेल,
अरे आकाक्षाच्या पंखानी अश्रुनाही जखडूंन टाकल असेल,
लिंकनचे शब्द आठव अश्रु ढाळायला लाजू नकोस,
गीतेतले शब्द आठव हातपाय गाळून बसु नकोस,
अरे अटकेपार झेंडे लाव पण मायमराठी विसरु नको,
सीलिकॉन वॅलित जा पण सहयाद्रिला विसरु नको.
अरे अन्न दिलं, वस्त्र दिलं, सह्याद्रीनंच ओसरी दिली,
आई बापानं कष्ट करून, शिक्षणाची शिदोरी दिली,
गूरुजनानी संस्कार दिले, गावक-यानी यारी दिली,
अरे टपरीवरच्या अप्पानेही वेळोवेळी उधारी दिली,
देश सुटला पोटासाठी बंध इथले तोडू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

पोटापाण्यासाठी मित्रा दहा दिशांना जायला हवं,
दिशा देण्या प्रवाहाला प्रवाहापुढ़े पळायला हवं,
कासवासारखं विश्वासानं एकेक पाउल टाकायला हवं,
अरे आठव्या घरच्या प्यादयासारखं वज़ीर म्हणून जपायला हवं,
एखाद स्वप्न देशासाठी आपणही पहायला हवं,
व्यावसायिकतेच्या दूनियेत या भावनानाही जपायला हवं,
नमस्कार सांग लिबर्टीला, पण आई भवानी विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सहयाद्रिला विसरु नको.
स्वर्गसुखं सगळी मित्रा हात जोड़ून उभी असतील,
भूरळ पाडतील तुला मित्रा आणि मग मर्यादेला हसत बसतील,
मंद मंद उजेड़ात कुठंतरी पार्टयासुद्धा होत असतील,
रॉक एन्ड रोलवर बेभान हो, पण ताल लताची विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

पंखात शक्ती आल्यावरती पाखरं दूर उड़ून जातात,
आई-वडिलांच्या घ़रटयात मग आठवणीची भुते रहातात,
अरे आठवणीची भुते आईला रोज अश्रुची भेट देतात,
स्वप्नात भेटेल तुला तर तिची झोपसूध्दा पळवून नेतात,
आईच्या चरणी परत ये, स्वर्गात सुध्दा रमु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

वाट पहात मित्र तुझी पानपट्टीवर थांबला असेल,
मग तुझ्या वाटणीचा ग्लास पार्टीत तसाच उरला असेल,
बॅट घेवुन पिंटया एकटाच मैदानात उतरला असेल,
तुझ्याविना संघ महोदया फायनल मॅच हरला असेल,
अरे भेटीसाठी तुझ्या प्रत्येकजण आतुरला असेल,
आणि आठवणींनी गावच्या तुझाही उर भरला असेल,
भरारी मार उंच आकाशी पण मातीचं नात तोडु नको,
वाटत असेल तूलाही मित्रा सहयाद्रित परत यावं,
कामधंदे सोडुन सगळे डोंगरदरीत फ़िरत रहावं,
निशाचरासारखं गुपचुप रात्री रोज बाहेर फिरत रहावं,
क्रिकेट खेळावं डोंगरावरती दमुन भागुन गावात यावं,
झंकारची भेळ खावी, अन् कृष्णामाईच पाणी प्यावं,
अरे एक़्वाफ़िनाच पाणी पी, पण कृष्णामाईला विसरु नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

परवाच पाहिलं मित्रा आपला सह्याद्रीच रडत होता,
त्याचा म्हणे हिरा कूणीतरी पळविला होता,
भवितव्याची स्वप्नं दाखवून राणीच्या मुकूटात ठेवला होता,
प्रकाशाला त्याच्या आता सह्याद्रीच पारखा झाला,
सह्याद्रीच्या बुरुजा असा आयत्यावेळी ढळू नको,
बिझनेस वॉरच्या योध्दा असा मैदान सोडून पळू नको,
मग नुसताच आवंढा गिळू नको, नुसतीच मुठ वळू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सह्याद्रीला विसरु नको.

सह्याद्रीच्या कुशीत मित्रा मोठी रत्न होवून गेल्येत,
देशासाठी नररत्नानी सर्वस्वाची होळी केली,
अरे आपल्यालाही ज्या सह्याद्रीनं विश्वास दिला, प्रेरणा दिली,
त्याचीच मांडी आज का रे फूटकया काचांनी भरुन गेली?
असेल देश ग़रीब आपला, कचरा म्हणून हिणवू नको,
सिलिकॉन वॅलीत जा पण सहयाद्रिला विसरु नको.

वडील रागावणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
आई सूचना करणार नाही हवं तर, तू फक्त परत ये,
मित्र उधा-या मागणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
शेजारीही चुगल्या करणार नाहीत हवं तर, तू फक्त परत ये,
मॅच अर्धी राहिली मित्रा, तू फक्त परत ये,
तुझीच बॅटिंग पहिली मित्रा,तू फक्त परत ये !!

गावाची सकाळ

 


कमालीचा गारवा, पानावरील दव

हिरवी गार झाडी आणि चहाची गोड चव

गाईचा तो हंबरडा आणि पाखरांची किलबिल
नदीच्या पाण्यावरील मोत्यांची ती झिलमिल

म्हशींच्या धारा आणि बांधावरची दळणवळण
वसुदेवाचा हरीनाम संगे फटका आणि गवळण

आंघोळीची लगबग आणि चुलीचा तो वास
कौलारू घर आणि अंगणी शेणाची आरास

रस्त्यांवरली धूळ आणि फोडणीचा आवाज
ती देवाची आंघोळ आणि तो चंदनाचा सुवास

टपोऱ्या पानाची तुळस आणि अंगणातला तो प्राजक्तसडा
उगवता सूर्य आणि डोंगराच्या त्या सुवर्णकडा

गेले ते दिवस गावचे आता फक्त आठवण
गोड गोड त्या क्षणांची मनी फक्त साठवण

Thursday, December 2, 2010

भंडारदरा परिसरातील निसर्गसौंदर्य !!

 
 भंडारदरा व परिसरातील निसर्गसौंदर्याचा अनमोल नजराणा पाहताना "ऋतू हिरवा, ऋतू बरवा...' या ओळी ओठावर येतात. येथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. हिरव्यागार वृक्षराईच्या कुशीतुन खळखळणाऱ्या धबधब्यांची मालिका, थंडगार झोंबणारा वारा, शुभ्र धुक्‍याने लपेटून घेतलेले रस्ते पाहताना मनाला मिळणारी शांतता, एक अवर्णनीय व अविस्मरणीय अनुभव ठरतो.

या परिसरात पर्यटकांसाठी पंचतारांकित सोयी नाहीत, मात्र ग्रामीण महाराष्ट्राचे दर्शन घडते. एका बाजूला निसर्गाचे मनमोहक रूप व दुसऱ्या बाजूला तेथील कष्टमय, खडतर लोकजीवन पाहायला मिळते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व गिर्यारोहकांना साद घालणारे व सर्वांत उंच असणारे १६४६ मीटर उंचीवरील कळसुबाईचे शिखर येथे आहे. शिवकाळात शत्रुपासुन स्वराज्याचे संरक्षण करून, टेहेळणी मनोऱ्याचे काम करायचे ते कळसूबाई शिखर. येथे अगस्ती ऋषींचा पुरातन आश्रम असून, प्रभू रामचंद्रांनी भेट दिल्याचे सांगितले जाते.

प्रवरा नदीवर बांधलेल्या भंडारदरा धरणाचे दूरपर्यंत पसरलेले पाणी पाहण्याचा आनंद अवर्णनीय बनतो. धरण भरल्यानंतर कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेण्याचा आनंद पर्यटक मनसोक्त घेतात. याच परिसरात १७० फूट उंचीवरून खाली कोसळणारा रंधा तसेच अंब्रेला, नेकलेस आदी फॉलची मालिका डोळ्यांचे पारणे फेडतात. तर अमृतेश्‍वराचे मंदिरात मनाला शांती मिळते. याच हिरव्या वृक्षवेलींनी नटलेल्या वनराईत बिबट्यांचा असलेला संचार ऐकून ते पाहण्याची उत्कंठा जागृत होते, तसेच अंगावर काटाही उभा राहतो.

याच भागातील निसर्गरम्य रतनगड, साधन व्हॅली, रांगड्या अलंग-मदन-कुलंग पर्वत शिखरांच्या रांगा हजारो पर्यटकांच्या आकर्षण बनलेल्या आहेत.