Sunday, September 26, 2010

द खान अकादमी : जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुली शाळा

भारतीय आई अन बांगलादेशी वडिलांचे सुपुत्र असलेले अमेरिकास्थित श्री खान हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट च्या माध्यमातून खुली शाळा चालवतात. आजवर २ लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. पूर्वाश्रमीचे सिलीकोना व्हेली मध्ये नोकरी करणारे श्री खान ह्यांनी २००४ ला हा प्रयोग सुरु केला. आता ३० विषयांवर (उदा. Maths, Biology, Chemistry, Physics and Economics. Lessons in Mathematics cover Algebra, Arithmetic, Geometry, Trigonometry, Statistics and Calculus. ) शेकडो व्हिडीओ च्या माध्यमातून ते ज्ञान प्रसाराचे काम करीत आहेत.
श्री खान स्वत: इलेक्ट्रिक इंजिनीअर आहेत. त्यांनी अमेरिकेतून इलेक्ट्रिक आणि संगणक विषयात पदवी अन पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी एम.बी.ए. केले आहे. बिल गेटस आणि त्यांच्या मुलांनी देखील हा प्रयोग अनुभवला आहे.
ज्यांचेकडे संगणक आणि इंटरनेट सुविधा आहे अश्या सर्वांनी http://www.khanacademy.org/ या वेबसाईट वर जाऊन व्हिडीओ शिक्षणाचा लाभ घ्यावा. या सामाजिक उपक्रमाला अमेरिकेतील अनेक दानशूर व्यक्ती अन गुगल कंपनीने आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे.
खेडोपाडी ज्ञान प्रसाराचे काम करणार्या या आधुनिक भगीरथाला आमचा मानाचा मुजरा!!!
इंडियन एक्सप्रेस ह्या दैनिकातील सविस्तर वृत्त:http://www.indianexpress.com/news/he-teaches-30-subjects-to-2-lakh-students-virtually/688154/1

Saturday, September 25, 2010

THE POWER OF WATER !!

The power of water is slow but over time it can erode vast areas and deep canyons - a bit at a time.Water adapts itself to the existing terrain but still continues to exert its power.It can be harnessed for constructive purposes like hydroelecric projects and canals for irrigation and rivers for navigation. Actually water is needed for all living things.THE POWER OF POSITIVE REVOLUTION is like the power of the water. A few drops of rain over a large area eventually collects into a mighty river. Each drop makes only a small contribution !!

Twenty-Seven Verses On Mind Training !!



1) With body, speech, and mind fully aligned, I prostrate fervently before those rare beings, who are victorious over all notions of limitation, and before their spiritual daughters and sons. May a cosmic celebration of pure poetry, perfectly expressing the most subtle teaching of these victorious sages and the inheritors of their wisdom, now burst forth like an infinite garden in perpetual spring.
2) Gaze calmly with the clear eye of Prajnaparamita (Perfect Wisdom) upon universal manifestation, this beginningless tapestry woven from vibrant karmic threads of conscious beings, and listen to the harmonious symphony of interdependence. Purify entirely from the slightest shadow of negativity this boundless expanse of apparent struggle and conflict. With diamond-clear intention, instill faith everywhere. With mirrorlike wisdom, stabilize all chaotic minds.
3) If shadows of negativity are not dispelled immediately, these strange insubstantial absences of light gain immense potency with every new action, until even those who understand the dangers of negation will not have enough power to choose the way of Clear Light. Even those who study philosophy and speak eloquently are unable to release themselves from illusory darkness.
4) The full spectrum of struggling and aspiring humanity, from immature persons to advanced contemplatives, suffers the painful delusion of clinging to these empty shadows as they become filled with affective power by self-centered action and intention.
5) This apparent bondage, this clinging to shadows, is constituted by reactions of pleasure and pain, obviously or subtly rooted in self-serving motivation. By those rare beings who have gone beyond, who throughout all time abide in bliss as Buddhas, the true nature of reactions and their results is clearly known to be insubstantial. But the boundless expanse of self-oriented beings, who bind themselves inexorably to selfish motivation, therefore cannot liberate or even distance themselves slightly from egocentricity.
6) We should meditate carefully and thoroughly upon the inevitably binding nature of negativity, learning to discriminate sensitively and unerringly between the actions which negate the preciousness of others and actions which affirm and judiciously care for others. From this clear viewpoint, renounce all negation and strive with the total commitment of your being to become entirely affirmative of all life everywhere.
7) The seeds of action are positive and negative intentions. Any intention consciously rooted in selfless motivation, desiring only sheer goodness for all conscious life, will establish the stable ground of goodness and will universally generate rich results of goodness. Any intention even slightly weakened by selfish motivation undermines both the ground of our life and its fruits. Intention is the sole creative force of existence.
8) To cling to the intention of triumphing over another, the desire to prosper at the expense of any being or to indulge in the slightest bias against any being because of personal feelings of attraction or repulsion, these alone are the causes for whatever suffering exists in personal lives and in the universe as a whole. We should meditate ceaselessly on this revolutionary truth, remaining conscious of it during every moment of existence.
9) Those who attempt to deceive with words of advice that in any way exalt selfishness and depreciate selflessness become hopelessly lost in narrow-mindedness, obsessed with their own selfish interests. Such persons create the only error in the universe: diverting our precious care and concern for others to ourselves. This deception not only expresses hatred for Buddha's wisdom but is the absurd attempt to destroy universal Buddha nature.
10) To avoid decisively this disastrous way of hatred, bring to birth within your stream of awareness the maternal mind of totally positive intentions toward all beings as toward cherished children. This mind of kindness, supremely skillful in loving care, unveils the infinite value of every single life, demonstrating compassion as the meaning of existence. But the clumsy negative mind, operating blindly without concern for the preciousness of others, drains the nectar of meaning from human life. Cultivate diligently the selfless love that transforms every thought and action into tangible help for conscious beings.
11) The method taught by awakened sages to develop this skillful mind of kindness is to cut the root of all selfish projections by repeatedly and intensively studying Perfect Wisdom, meditating single pointedly on its essence in a state of contemplative stillness and stability. With the clarity and honesty of such concentration, projected worlds of self-serving desire will melt in the sunlight of meditation, like structures of ice, revealing the magnificent secret of our existence, its total significance and absolute justification, which is active compassion for all conscious life.
12) Such meditative practice brings to light the mind which envisions only the well-being of others, which is constantly grateful to all beloved beings for the immeasurable kindness they have poured forth through beginningless time as mothers, fathers, children, friends, benefactors, and teachers. This mind of goodness knows only the ceaseless longing to benefit all these blessed beings without exception in whatever manner and on whatever level imaginable.
13) To remember vividly during every moment the kindness that has been expressed by all beings, and to cultivate an intense and constant longing to return even a small portion of this kindness, unveils the true significance of life in all worlds. The person who fails to respond wholeheartedly to this call for universal kindness and concern is on a lower plane of development than animals, who are capable of experiencing immense gratitude.
14) Those who unhesitatingly embrace and tenderly serve all suffering creatures during this degenerate age, just as a loving mother painstakingly cares for even the most wayward of her children, they alone are the teachers of the holy life who authentically walk the Buddha Way.
15) The mind that faithfully and tirelessly serves and elevates conscious beings is sheer goodness, constantly giving the gift of itself, its faith in ever-expanding goodness, to all other minds thereby benefiting them in the most direct way. Of all possible forms of benefit on any level, the highest is to teach this practice of love, this indomitable faith in universal goodness, by the direct transmission of selfless awareness flowing transparently from mind to mind in accordance with the need and capacity of each mind. This is true teaching, tangibly transmitting the living energy of universal goodness, which becomes perpetually active in the recipient, even during the most pressing times of crisis, never evaporating into mere words or concepts.
16) During this blissful practice, continually cultivating the wonderful, ever-expanding mind of goodness, even the slightest lack of sympathetic joy disappears and awareness becomes more concentrated and selfless, while the selfish emotions and conceptual projections which compose this narrow conventional world are gradually effaced, and we are completely liberated. The brilliant sun of Great Compassion shines unobstructed. The spirit of wholehearted love in every thought and action constitutes the spontaneously radiating sunlight, effortlessly melting the mist of self-centeredness, vastly strengthening our constant efforts for all beings.
17) Beings benefit each other, consciously or unconsciously. Even enemies become profound benefactors in subtle ways. Those who clearly perceive this radical principle find no isolated object for hostile thought. They can discover and encounter only friends, benefactors, and inseparably related beings. This insight avoids aggressive thinking and allows the mind to expand endlessly into wholesomeness, generosity, and sympathy.
18) Never offering the slightest encouragement to hostility, never hesitating to embrace the concerns of others, pay complete attention to every altruistic impulse that arises in the stream of pure awareness. Contemplate the teaching of selfless compassion, calming and clarifying the turbulent flood of egocentric mind with the sweetest meditation. Renounce the meaninglessness of selfish life. Become devoted to the true meaning of existence: the spontaneous, active compassion for all living beings. If one does not refute self-centered motivation, the subtle tendencies of the mind can never be free from the gross or subtle disposition to negation.
19) Transform the intense activity of daily life into the harmonious expression and teaching of truth by affectionately reminding and being reminded that the bitter dark fruits of negating others are poisonous, to be most carefully avoided, while the sweet bright fruits of affirming others are life-giving, to be thoroughly enjoyed. Authentic delight exists only in serving others, and suffering springs only from harming others or insensitively ignoring the needs of living beings, all of whom are as intimately related to us as our own precious mother and father.
20) So sensitive an ecology is the interdependence of all, that the slightest attention and assistance to others creates moral elevation for ourselves and humanity, while the slightest indifference or neglect toward others creates moral harm for ourselves and our civilization. The faintest spark of ill will toward other beings can burst forth into a terrible forest fire, consuming vast expanses of sympathetic joy. Even the faintest negative reaction or malicious wish opens wide channels throughout our entire being for life-destroying poisons of negation and life-obscuring shadows of self-cherishing.
21) Cast far away from all precious humanity these lethal doses, these ominous shadows, by cultivating instinctive admiration and love for those who practice the way of selflessness. Adore such bodhisattvas for their irreversible vow to remain intimate with the struggle of living beings as beacons of love and as the light of panoramic vision.
22) Once identified with this luminous way of life, you will experience every moment as soaked in bliss, tasting the delight of compassionate responses to even the most negative actions of other beings. I have composed this poem of rapturous affection further to strengthen the diamond-sharp conviction of those already faithful to the path of wisdom.
23) Gazing back over these exuberant verses, I perceive an abundant banquet of poetry, easy to assimilate and to understand clearly. Entirely in accord with the teaching of the sutras and with the deep realization of awakened sages, these words are full of subtle nourishment. To contemplate their various levels of meaning is not only to taste the nectar of wisdom but is to walk the sublime path of compassion.
24) This surprising poem condenses into a few verses the profound and extensive teachings of my lineage. I have composed these melodic lines, like heavenly wish-fulfilling gems, to benefit the minds of all beloved beings. Those with strong capacity for meditation in action will deepen their insight into the nature of Reality by following these words into the heart of Buddha.
25) Some authors tie complex knots of philosophical terms, while others rave incoherently like mad persons. In the most beautiful hermitage, the snow mountains of Tibet, this poet, known as Ever-Expanding Mind of Goodness, has attempted to write with richness and lucidity.
26) May the bliss of the mystical fusion of transcendent wisdom with tender compassion fall like sweet summer rain from dark blue clouds, the motivation of goodness, skillfully and gracefully opened by lightening flashes of selfless awareness. May conscious beings in every realm and condition enjoy their glorious existence as the dynamic play of Lord Buddha's four modes of manifestation: transparent, universal, heavenly, and earthly.
27) Having become, through the medium of this poem, the powerful and eloquent speech of Divine Manjushri, speaking directly with the harmonious and melodious voice of the transcendent Wisdom Deity, may I and all my relations and companions, from small insects to tenth-level bodhisattvas, attain the blessings of primordial Buddha nature: infinite bliss, infinite fulfillment, infinite perfection, and universal conscious enlightenment.

***********************************************************************

These 27 verses are perfect for guideline of everyday living. Perfect for harmony in families. Perfect for harmony between partners. Perfect for gaining peace and inner calm. Supreme for beginning, middle and end in one's spiritual journey.  This is something we should memorize, practice, take refuge in and use as a guideline for our dharma practice.
If you have a guru, you should practice this very much so you can advance in whatever sadhanas you are being guided in. If you don't have a guru, it is the perfect outline to live our lives, to endeavour in our spiritual practice, to strive to become in liew of a guru, until you find your teacher… it is all the more important to follow if you don't have a teacher and feel lost or don't know where to start. Print this out. Frame it. Keep it in your pc, pass it to friends, make posters, put it on your altar, it should be in your sadhana book. No serious practitioner should be without it.
It is not hard… because it is really a guideline to finding who we are deep inside that has been temporarily lost with all the round of rebirths, pain, insecurities,ego, fear, loss, and living in illusory states of mind. You should strive to learn, and put into practice what these 27 verses contain. They contain the complete Lam Rim in short form. If you are serious about Lam Rim or your spiritual practice, then master and live these 27 verses daily and now. It might be hard in the beginning, but what isn't and it is worth it.. These verses will literally change your life!!
For those who wish to gain attainments, transform, change and become happy…recite the above 27 mindblowing sacred lines by our Lord and Sage Tsongkapa the Incomparable DAILY AS A SADHANA. THEN CONTEMPLATE THE MEANING WHILE RECITING OM AH RA BA ZA NA DHI..
If you are my student or say I have benefitted you, then do this daily as a special request from me. If even you have not met me, but you wish to or have an affinity with me, then 'prove' it by reciting this daily and practicing these precious life changing verses. The secret to happiness is in these verses. The ultimate cure to depression and feeling bitter are within these verses if you practice…try it..what do you have to lose..
IF YOU ARE A SOCIAL WORKER, A SINCERE PRACTITIONER,  A POLITICIAN, DOCTOR OR ANY PUBLIC SERVANT OR WORK FOR A CHARITY, THESE VERSES ARE VERY NECESSARY FOR YOU TO PRACTICE AND REMEMBER IN ORDER TO NOT LOSE HOPE, BECAUSE YOUR JOB COULD BE QUITE TOUGH….
A BIG REASON FOR YOU TO RECITE AND PRACTICE THESE DAILY IS-YOU DESERVE TO BE HAPPY..

Bill Gates speech: 11 rules your kids did not and will not learn in school


Rule 1: Life is not fair – get used to it! 

Rule 2: The world doesn’t care about your self-esteem. The world will expect you to accomplish something BEFORE you feel good about yourself. 

Rule 3: You will NOT make $60,000 a year right out of high school. You won’t be a vice-president with a car phone until you earn both. 

Rule 4: If you think your teacher is tough, wait till you get a boss. 

Rule 5: Flipping burgers is not beneath your dignity. Your Grandparents had a different word for burger flipping: they called it opportunity. 

Rule 6: If you mess up, it’s not your parents’ fault, so don’t whine about your mistakes, learn from them. 

Rule 7: Before you were born, your parents weren’t as boring as they are now. They got that way from paying your bills, cleaning your clothes and listening to you talk about how cool you thought you were. So before you save the rain forest from the parasites of your parent’s generation, try delousing the closet in your own room. 

Rule 8: Your school may have done away with winners and losers, but life HAS NOT. In some schools, they have abolished failing grades and they’ll give you as MANY TIMES as you want to get the right answer. This doesn’t bear the slightest resemblance to ANYTHING in real life. 

Rule 9: Life is not divided into semesters. You don’t get summers off and very few employers are interested in helping you FIND YOURSELF. Do that on your own time. 

Rule 10: Television is NOT real life. In real life people actually have to leave the coffee shop and go to jobs. 

Rule 11: Be nice to nerds. Chances are you’ll end up working for one

Wednesday, September 22, 2010

चार मीटर कपडवाला

मुंबईत सातरस्त्याजवळ ऑर्थर रोडला लागून एक छोटेसे दुकान आहे ‘प्रीती आर्ट्‍अस’ नावाच्या या दुकानात सुंदर मूर्ती, चित्र, शोपीस व स्टीलचे फर्निचर मिळते. पण आश्चर्य असे की, हे दुकान कधी चालू तर कधी बंद असते. शेजारच्या पानवाला सांगतो, ग्राहक दुकानाबाहेर उभे राहतात दुकान उघडण्याची वाट पाहत, पण मालक मात्र आपल्या मर्जीने येतो आणि जातो. याचे कारण या दुकानाच्या मालकाचे एक वेगळेच वेड.

मुंबईसारख्या ‘फास्ट लाइफ’ ने झपाटलेल्या जीवनात जिथे जिवंत माणसांसाठी वेळ काढता येत नाही तिथे किशोरचंद्र भट आपला कामधंदा बाजूला ठेवून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईतील वेगवेगळी स्मशाने पालथी घालत असतात. आपल्या दुकानात बसून ते फक्त कामाचेच फोन न घेता शवगृहांचे, इस्पितळांचे व पोलीस ठाण्याचेही फोन सतत घेत असतात. हेच लोक त्यांना बेवारशी शवांची माहिती देऊन बोलावून घेतात. १९६८ पासून त्यांनी हे कार्य सुरू केले. त्याच वर्षी सुरतमध्ये पूर आला होता. खाद्यवाटप करणाऱ्या एका संस्थेसोबत १७ वर्षीय किशोर भटही गेले होते. माणसं आणि जनावरांना एकत्र मरून पडलेले पाहून त्यांना खूप अस्वस्थ वाटले. शेवटी थाटात आणि तोऱ्यात जगणाऱ्यांचीही मातीच होते हे त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले व तेव्हाच सुरू झाली त्यांची मृत्यूशी मैत्री. विविध इस्पितळांमध्ये जाऊन त्यांनी सांगितले की, ‘बेवारस मृतदेह मिळाले तर मला कळवा’ हे ऐकून अनेकांना संशय वाटायचा. सुरुवातीला तर हा मृतदेहांवरील गोष्ती चोरत असेल अशी शंकाही व्यक्त करण्यात आली, पण सत्य व चांगल्या हेतूला पुरावे लागत नाहीत. किशोर यांनी आपल्या निःस्वार्थ कार्याने हे सिद्ध केले आहे. आजपर्यंत त्यांनी जवळ जवळ २६०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा किशोर यांनी अनेकांची मदत केली. देहाच्या चिंध्या बॅगेत भरून त्यांना अग्नी दिल्याचे त्यांना आठवते. यावर ते म्हणतात, मृत्यू हा कधीही आणि कुठेही येऊ शकतो. पैशांसाठी धावणारे व साम्राज्याचे कर्तेदेखील मृत्यूपुढे भिकारीच असतात. मृत्यूबद्दल सर्वात महत्त्वाचे काही सांगायचे झाले तर तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न तसा साधारणच होता. पण त्यांच्या असाधारण उत्तराने मला थक्क केले, ‘कफन को जेब नही होती और मौत रिश्वत नहीं लेती.’ हे ऐकून अंगावर काटा आला, पण त्यांच्यासाठी हा आयुष्याचाच एक भाग आहे. त्यांच्या दुकानात कापडचे तागे, अगरबत्ती, गंगाजळ, मडके... सर्व काही एका कोपऱ्यात ठेवले आहे. कापडाचे चार मीटरचे तुकडेदेखील वेगळे काढले आहेत. म्हणजे तातडीने जावे लागले तर आयत्या वेळी त्रास नको. याच कपड्याच्या तुकड्यांनी शव बांधले जातात. बोलावणे आले की, भट हे तुकडे घेऊन पोहोचतात. म्हणूनच त्यांना ‘चार मीटर कपडावाला’ असे ओळखले जाते. हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन .... कोणत्याही जातीची व्यक्ती असली तरी भट त्यांना शेवटचा विधी संपन्न करून देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हिंदूना संपूर्ण विधीप्रमाणे जाळले जाते. मुसलमानांना त्यांच्या शास्त्रांचे पालन करून पुरले जाते व मृत व्यक्तीच्या जातीचा मन ठेवनूच अंत्यसंस्कार केले जातात. ‘रद्गती’ नावाचा त्यांचा एक ट्रस्ट त्यांनी बनवला. ‘डोनेशन घेण्यासाठी हा ट्रस्ट नाही स्थापन केला मी. माझ्यानंतर हे कार्य सुरू राहावे व लोकांनी यात सहभाग घ्यावा हाच या स्थापनेचा हेतू आहे’ असे ते सांगतात. दुकानाबाहेर दोन व्हॅन सतत उभ्या असतात. फुकट शव नेण्याची सुविधा हा ट्रस्ट सामान्य माणसांसाठी देतो व मयताचे सारे सामानही फुकट वाटले जाते. सर्व इस्पितळे आता किशोर भट यांना ओळखतात. काही गरीबांकडे उपचारांवर खर्च झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे उरत नाहीत. अशा वेळी किशोरजींचा नंबर दिला जातो. अशीच एक घटना त्यांनी सांगितली. एका बाईची छोटी पोर नायर हॉस्पिटलमध्ये आजाराने मेली. मेलेल्या मुलीला ती सोडून चालली होती. कारण स्मशानाचा व अंत्यसंस्कारांचा खर्च तिला परवडणारा नव्हता. ‘देव नाही!’ असे म्हणून ती रडत रडत बाहेर पडत होती. तेवढ्यात किशोरजी तिथे पोहोचले. तिला थांबवून ते म्हणाले, ‘मी सर्व करीन. मला देवाने पाठवले आहे.’ त्या आईचे काळीज भरून आले असेल आणि कदाचित देवाचीही तीच अवस्था असेल. खंर तर हे कार्य म्हणजे चांगलेपणाचा व देवावरच्या विश्वासाचाच प्रचार आहे, असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडत असतात. एकदा तर त्यांच्या दुकानाबाहेर झाडाखाली एक माणूस पडला होता. विचारपूस केल्यावर ‘मला टीबी आहे. दूर जा’, असे तो म्हणाला. किशोरजींनी त्याला टाटा इस्पितळात दाखल केले व त्याचा संपूर्ण खर्च करीत होते. एका आठवड्यात हा माणूस टॅक्सीने दुकानासमोर आला. किशोरजींना टॅक्सीचे पैसे द्यायला सांगितले. ‘मला वेळ नाही. तुम्ही माझ्यासाठी खूप केले, धन्यवाद’ असे म्हणून तो कोसळला. फक्त त्यांना भेटण्याकरिता त्या माणसाने श्वास धरून ठेवला होता. माझ्यावर लोक असेच प्रेम करतात, हे सांगून त्यांनी हा किस्सा बंद केला. अनेकांचे आशीर्वाद आणि देवाची कृपा त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. त्यांच्या दुकानात पाच मिनिटे बसलात तरी प्रसन्न वाटते. लोक मृत्यू, त्रास आणि जनसेवेपासून पळतात हे त्यांना फारसे आवडत नाही.गेल्या वर्षी एका इस्पितळातील सहा एड्सचे रुग्ण मेले. किशोरजींनी शिवडीतील स्मशानात त्यांचे अंत्यसंस्कार केले. तेथील एकाने त्यांना सहानुभूती देण्याकरिता म्हटले, मी मदत करायला येत होतो. आपले संबंधी होते का मृत? किशोरजींनी ‘ ते एड्सचे पेशंट होते’ सांगितल्या क्षणी, ‘बरं झालं, मी नाही आलो’ असे म्हणाला. हे ऐकून किशोरजींना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधी कधी, असे म्हणाला. हे ऐकून किशोरजईंना दुःख झाले. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्यासारखा वागतो कधीकधी, असे ते म्हणतात. मुंडके नसलेल्या, किडे पडलेल्या, तुकडे झालेल्या, झडलेल्या, जळालेल्या विचित्र परिस्थितीतल्या शवांना हात लावून, त्यांचे विधी व संस्कार करूनही त्यांना कधी घाण नाही वाटली किंवा कोणता रोग नाही झाला. ते या ढोंगी समाजातील कुचकट भीतीचा व कुटील विचारांचा निषेध करतात. त्यांच्यासाठी सगळे एकच आहे. हल्लीच ताजमधील प्रकरणांत मेलेले १८ शव कस्तुरबा इस्पितळात आणले गेले. किशोरजींना फोन करून बोलावले गेले. ‘सतरांनाच कापड बांधा’ हा आदेश ऐकून त्यांनी ‘का?’ असे विचारले. ‘तो एक आतंकवादी होता. आता तो फक्त एक मृतदेह आहे.’ सर्व इस्पितळांचे व पोलिसांचे लाडके किशोर भट फारच आनंदी व्यक्ती आहेत. ‘सर्व संस्कार केलेले आत्मे माझी काळजी घेतात’ हे त्यांचे म्हणणे आहे. या पिढीला आत्मे आणि संस्कार हे शब्द जरी जरा जड वाटले तरी एक मात्र शिकण्यासारखे आहे, चांगल्यावर विश्वास ठेवा, चांगले करा आणि चांगलेच शोधा, म्हणजे सापडेल. खरं तर हा ‘चार मीटर कपडावाला’ आठवड्याचा माणूस नसून आयुष्याचाच माणूस आहे. दुकानातील शंकराची थ्रीडी मूर्ती आणि किशोरभाईची कीर्ती प्रत्यक्षच पाहायला हवी. जमल्यास नक्की पहा.
किशोर भट २३०८७९७६, २३०९७९७४

विधी आणि संस्कार

भरतभूमीमधील इतर हिंदुधर्मीयांप्रमाणेच महाराष्ट्रातील हिंदूचे धार्मिक जीवन संस्कार नामक विविध धार्मिक विधी आणि परंपरांच्या भोवती गुंफलेले आहे. संस्कार म्हणजे यज्ञयागादी विधिद्वारे केलेली शुद्धिक्रिया. स्त्रिया आणि म्हणून संस्कार ह्यांच्यामधील सुप्त शक्तींना मूर्त स्वरूप देण्यास्तव त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक परिवर्तनाचे बाह्य प्रतीक म्हणून संस्कार आवश्यक मानले जातात. उपनयनासारख्या काही संस्कारांनी आध्यामिक तद्‌वतच सामाजिक हेतू साध्य होतात. त्यामुळे वेदाभ्यासाचे द्वारे खुली होतात. आणि संस्कार करून घेणाऱ्या व्यक्तीस विशिष्ट सामाजिक अधिकार प्राप्त होऊन तीवर कर्तव्यपूर्तीचे बंधन घातले जाते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या देखील संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात आपणास नवीन भूमिका वठवावयाची आहे, तसेच धर्माचरण विषयक नियमांचे पालन आपणास करावयाचे आहे, असे त्या वक्तीच्या मनावर बिंबविले जाते. त्याद्वारे आत्मोन्नतीचा मार्ग खुला होतो. नामकरण, अन्नप्राशन आणि निष्क्रमण ह्यांसारखे विधी व संस्कार प्रायः सामाजिक समारंभ स्वरूपाचे होत. त्यांमुळे प्रेम आणि वात्सल्याची अभिव्यक्ति तसेच आनंदोत्सव साजरे करण्याची संधी प्राप्त होते. गर्भाधान, पुंसवन आणि सीमातोन्नयन यांसारख्या संस्कारांना पौराणिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक संस्कार असून त्याद्वारे दोन भिन्न व्यक्तिमत्वांचे मीलन होते. त्या मीलनातून वंशवृद्धी साध्य करून आत्मसंयम, आत्मत्याग आणि परस्पर साहचर्यामधून दोघांचा आत्मोद्धार करणे हा विवाह संस्काराचा मूळ हेतू असतो.

संस्कार व ते साजरे करावयाचा क्रम ह्याबद्दल वेद आणि गृह्यसूत्रांमध्ये नियम घालून दिलेले आहेत. तथापि विविध स्मृतिकारांमध्ये संस्काराच्या संख्येबद्दल एकवाक्यता नाही. सोळा संस्कार मात्र अनिवार्य मानलेले आहेत. कालक्रमानुसार बरेच संस्कार अस्तंगत झाले असून स्मृतिग्रंथांनी विहित केलेल्या पद्धत्यानुसार संस्कार ब्राह्मणवर्गीय देखील करीत नाहीत. खाली नमूद केलेले विधी व संस्कार साजरे करण्याची महाराष्ट्रात पूर्वीपासून परंपरा होती.
  • ऋतु-संगमन (प्रथम ऋतुप्राप्तीची शुद्धी)
  • गर्भाधान (पुंबीज-रोपण विधी)
  • पुंसवन (पुत्रप्राप्तीस्तव गर्भारपणात केलेला विधी)
  • सीमांतोन्नयन (गर्भारपणात केलेला विधी)
  • जातकर्म ( नवजात अर्भाकाचे कानात शुभ मंत्रोच्चार)
  • पाचवी आणि सटवाई (अर्भकाचे रक्षण व त्याच्या ललाटाची रेषा शुभ व्हावी म्हणून केलेली पूजा)
  • नामकरण (बारसे)
  • कर्णवेध (कान टोचणे)
  • अन्नप्राशन (मुलाचे प्रथम भोजन, उष्टावण)
  • चौल, चुडाकर्म, जावळ (प्रथम केशकर्तन)
  • विद्यारंभ (अध्ययनाचा प्रारंभ)
  • उपनयन, मुंज (व्रतबंध)
  • समावर्तन, सोडमुंज
  • विवाह
  • चतुर्थीकर्म
  • अंत्येष्टी
उपरोक्त संस्कारांपैकी गर्भाधान विधी मुलींच्या लग्नाचे वय वाढल्यामुळे कालांतराने निरर्थक झाल्यामुळे कालबाह्य झाला आहे. नामकरण आणि चौल मात्र वेदमंत्राविना स्नेहसंमेलनाच्या स्वरूपात साजरे केले जातात. बरेच वेळा दोन अथवा अधिक संस्कार एकत्रच साजरे करतात. उदाहरणार्थ, चौल उपनयनप्रसंगी करतात, तर सोडमुंज उपनयनानंतर त्याच दिवशी उरकून घेतात.
प्रत्येक शुभ संस्काराचा प्रारंभ गणपतिपूजन, पुण्याहवाचन मातृकापूजन आणि नांदिश्राद्ध ह्या विधींनी केला जातो. गणपतिपूजन म्हणजे मूठभर तांदळाच्या ढिगावर एक सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवून आपल्या आगमनाने संकल्पित संस्काराची सिद्धी शुभदायक व निर्विघ्न करण्यास्तव केलेले आवाहन होय. संस्कार करणारी व्यक्ती हात जोडून गणपतीला नमस्कार करून `ओम महागणपतये नमो नमः । निर्विघ्नम कुरू ॥' असा मंत्रोच्चार करते.

पुंसवन

हा विधी केल्याने पुत्रप्राप्ती होते अशी श्रद्धा असल्याकारणाने त्यास पुंसवन असे म्हणतात. हा विधी बाईच्या गरोदरपणात तिसऱ्या महिन्यात करतात; कारण त्यामुळे गर्भ-लिंग ठरविणाऱ्या देवता प्रसन्न होऊन पुत्रप्राप्तीचा योग संभवतो.

पाचवी आणि सटवाई

हा जरी वैदिक संस्कार नसला तरी सर्व हिंदू लोक शिशू जन्मल्यानंतर पाचव्या व सहाव्या दिवशी पाचवी व सटवाईची पूजा करतात. बालकच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. जन्मानंतर पाचवी व सहावी या रात्री अर्भकास धोकादायक असतात व तेव्हाच त्याच्या ललाटीची रेखा आखली जाते असा सर्वसाधारण समज आहे. म्हणून इडापिडा आणि भूतबाधा टाळण्यास्तव देवतांना प्रसन्न करतात.

नामकरण

बारसे या नावाने महाराष्ट्रात प्रचलित असलेला हा संस्कार सामान्यत: जन्मानंतर बाराव्या दिवशी साजरा करतात. पण स्मृतिग्रंथांनी विहित केलेला वैदिक विधी मात्र केला जात नाही. जन्मसमयीची ग्रहदशा व ज्योतिषशास्त्रीय परिस्थिती लक्षात घेऊन शुभ नाम शोधण्यासाठी ब्राह्मण पुरोहिताचा सल्ला घेतात. ह्या समारंभास प्रामुख्याने महिलांना आमंत्रण देतात. सर्व महिला बालकासाठी भेटवस्तू आणतात. ग्रॅनाईट दगडाच्या वरवंट्याला तेल लावून पाळण्यात ठेवतात. आपल्या अर्भाकास हातात घेऊन आई पाळण्याच्या एका बाजूला उभी राहाते आणि समोरच्या बाजूच्या महिलेस " कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या " असे म्हणते. समोरची महिला वरवंटा हातात घेते आणि मुलाला प्रथमच पाळण्यात घातले जाते. आई मुलाला द्यावयाचे शुभ नांव प्रथम त्याच्या कानात कुजबुजते आणी नंतर आमंत्रितांसमोर घोषित करते. सर्व महिला मग बालक झोपी जाण्यास्तव `पाळणा' गीत म्हणतात. अभ्यागतांना अल्पोहार व घुगऱ्या दिल्यावर नामकरण विधी समाप्त होतो.

कर्णवेध

हिंदू रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे. सामान्यपणे सोनाराकडून कानटोचून घेतात. सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो. मुलीचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्रथा आहे. `देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हास परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत' अशा मंत्राने कर्णवेधाचे वेदामध्ये समर्थन केलेले आहे. (ऋग्वेद १.८९.८)
 

चौल, जावळ

बालकाच्या डोक्यावरील केस जन्मानंतर प्रथमच कापण्याचा हा विधी असतो. हे केस अपवित्र मानल्यामुळे ते विधिवत कापून टाकतात. या विधीमध्ये यज्ञहोम करून कापलेले केस कुणाचाही त्यांवर पाय पडणार नाही अशा तऱ्हेने विसर्जित करतात.

उपनयन, मुंज

महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन व ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. प्राचीन झोरोआस्ट्रियन धर्मग्रंथ आणि आधुनिक पारशी लोकांच्या चालीरीती ह्यांच्याशी तुलना केल्यास असे दिसून येते की उपनयन संस्काराचा उगम इंडो-इराणियन संस्कृतीमध्ये झाला असावा. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.
धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.
मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.
उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.
तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन व वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.
उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.

विवाह

विवाह हा सर्वाधिक महत्त्वाचा संस्कार होय. एका विशिष्ट क्रमाने करावयाच्या अनेक समारंभाचा या संयुक्त विधीमध्ये समावेश होतो. वस्तुतः धर्मशास्त्रानुसार विवाह संस्काराच्या वेळी ४३ विधी साजरे करतात. तथापि सांप्रत काळात बहुतांश विवाह सनातन रुढीतील अनेक उपचार वगळून परिवर्तित पद्धतीनुसार साजरे केले जातात.
महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांमध्ये सगोत्र, सप्रवर आणि सपिंड विवाह निषिद्ध मानले जातात. तथापि मामेबहिणीबरोबर लग्न करण्यास मुभा आहे. अलीकडे बहिर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे.
सांप्रतकालीन हिंदू विवाह रूढीचे खालील तीन पद्धतीत वर्गीकरण करता येईल :

(१) वेदमंत्रोच्चाराचा समावेश असलेली आणि गृह्यसूत्रांनी निर्धारित केलेली वैदिक पद्धती

(२) वेदमंत्रविरहित पौराणिक पद्धती आणि

(३) लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने सुचविलेली पुनर्रचित वैदिक पद्धती.

उच्चवर्णीय लोक पहिल्या पद्धतीचा अंगिकार करतात, ब्राह्यणेतर दुसऱ्या पद्धातीचा तर कुठल्याही जातीचे लोक तिसऱ्या पद्धतीनुसार विवाह साजरे करतात.

विवाह रुढी

पारंपारिक विवाह रूढी खूपच विस्तीर्ण होती. अलीकडे मात्र त्यातील बरेच उपचार संक्षिप्त केलेले आहेत, तर काहींची विस्मृती झालेली आहे.
विवाह संस्काराच्या प्रारंभी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, इत्यादि आराधनात्मक विधी साजरे करतात. महाराष्ट्रातील प्रमुख विवाह विधी क्रमानुसार खाली दिले आहेत.

हळद

विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो. त्याची आई, बहिण व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात. उर्वरित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह, वधूगृही नेतात. वरपक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात. वधूला हळद लावताना नारळ व पाच मूठभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात. हळद लावल्यावर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधिले जाते.

सीमांतपूजन

वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळातच सीमांपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-बाप व नातलग वरपक्षांचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपति आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी व कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-बाप वराची पूजा करतात. आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.

वरप्रस्थान

वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो.

मंगलाष्टके

लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला नवऱ्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पहार असतात. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधानाने वधू विवाहबंधनात अडकते.

कन्यादान

कन्यादान विधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. `नातिचरामि' या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.

लाजाहोम

होमाग्नी प्रज्वलित केल्यावर लाजाहोम विधी होतो. वर मंत्रोच्चार करीत असताना वधू होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधू नवरदेवाच्या मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. तदनंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून अशी शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकाचे साथीदार राहातील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात.

सप्तपदी

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अप्रत्यावर्ती होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या सभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताच्या सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूःवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात.
सप्तदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंबधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.
वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्‌वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.

अंत्यंविधी

अंत्येष्टी

देहावसानसुद्धा एक शुद्धिसंस्कार आहे. एकादी व्यक्ती मरणोन्मुख असल्यास तिच्या मुखात लहानसा सोन्याचा तुकडा, तुळशीपत्र आणि गंगोदकाचे काही थेंब टाकतात. उत्तरेकडे डोके ठेवून मृतदेह जमिनीवर ठेवतात. पुरोहिताकडून मंत्रोच्चार चालू असताना मयताचा मुलगा अथवा मुख्य सुतकी व्यक्तीस शुद्धिक्रिया म्हणून आंघोळ करावी लागते. मृतदेहास आंघोळ घालून सुगंधी तेल लावतात आणि नवीन कपड्यात गुंडाळून फुलांनी सजवितात. सुवासिनी मरण पावल्यास तिला हळद व कुंकू लावण्याचा सन्मान प्राप्त होतो. वैदिक व पौराणिक विधी करणारे हिंदू बहुधा मृतदेहाचे दहन करतात, तर इतर लोक देह स्मशानात पुरतात.

उत्तरक्रिया

मरणानंतर सुतक पाळतात आणि बाराव्या अथवा तेराव्या दिवशी उत्तरक्रिया केली जाते. त्याप्रसंगी भोजन आयोजित करतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात गांभीर्यपूर्वक भरणीश्राद्ध करण्याची प्रथा आहे. सवाष्ण मेलेल्या सुवासिनीच्या नावे तिचा पती हयात असेप्रर्यंत भाद्रपदातील अविधवा नवमीला विशेष अर्ध्यदान करतो. आपल्या मृत पूर्वाजांच्या नावे अक्षय्य तृतीयेला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान आणि अर्ध्यदान करण्याची प्रथा रूढ आहे.
अशा प्रकारे आत्मशुद्धी आणि मनाचे उदात्तीकरन करण्यास्तव माणसाचे संपूर्ण आयुष्य विविध शुद्धिसंस्कारांनी संपन्न केले जाते.

चालीरीती आणि परंपरा

वाजत्या घुंगूरवाळ्याची पावलं घरात उमटणार आहेत अगर आपण आत्या होणार आहोत यातली चाहूल घरात लागली तरी आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. अशा वेळी मनात यायचं की, आपल्या वहिनीला एक सुंदर देखणी मुलगी व्हावी. त्या चंद्रज्योतीच्या उजेडात सारं घरदार उजळून निघावं आणि आपण हौसे मजेच्या सगळ्या सोपस्कारांच्या धांदलीत स्वतःला हरवून बसावं . लाल चुटूक होठांच, भुरभुरत्या जावळाचं, मऊसूच अंगाचं, गुलाबी गालांचं हसरं बाळ घरात यायचं म्हणजे केवढा आनंद! रेशमी खणाच्या कुंजीत हे राजबिंड रुपडं गुंडाळून सरीबिंदलीच्या न्‌ वाघनखाच्या साजानं नटवलं किंवा शेलक्या वस्त्रांच्या झुबल्या टोपड्यांनी शिणगारीत हातावर घेतलं म्हणजे किती मज्जा! हो बाई, सोनार घरी जाऊन सगळी बाळलेणी घडवून आणीन तरच राहीन पाच कुवारणी पुजून जिवतीची आराधना करीत घरात ह्या राणीच्या रुपानं महादेवीच अवतरलीय असा सांगावा घरोघरी धाडीन तरच नावची म्हणावी मी!
खरंच, दादाला मुलगी झाली ना की, माझ्या पायाला भिंगरी लावीन कायम काय आणायला फिरीन मी, झालंच तर मनाला पंख लावीत संगं भूक-लाडू तहान-लाडू घेऊन बारशाची निमंत्रण करायला घरोघरीचे उंबरठे झिजवीन. आमची आजी तर म्हणते की, पहिली मुलगी व्हावी म्हणजे घरात लक्ष्मी नांदते. तिच्या रुपानं सरस्वतेचा संचार होतो घरोदारी. तिच तर सांगणंच मुळी की, समींदर उफडा करीत हिरे माणीक वेचून बाळाचं झबलं टोपडं गुंफावं. खेळण्या पाळण्याला राघू मैना लावावेत. चंद्रसूर्याचे दिवे पाजळावेत. दारी लामण दिव्यांची रोषणाई करावी आणिक जिनगराला सांगून पाळण्यावर खेळण्याची अब्दागिरी झोकात तयार करून घ्यावी. पाच सवाष्णींच्या ओट्या भराव्यात. गावातल्या देवीला पुरणावरणाच महानैवेद्य दाखवून बाळीला आशीर्वाद मागावेत. झेंडू झेंडू गोंडं लावून राणीला टोपडं घालाव. आणिक त्या टोपड्याला पिंपळपान जडवून बाळीच्या गोरेपणाची बडेजाई मांडावी.

आमची आई तर म्हणते की, दादाची लेक म्हणजे दुधावरची साय. लेकासारखी तिची जोपा व्हावी.

लेकीची अंगलट जाईच्या फोफावानी
बया माऊलींन जोपा केलीया लेकावानी
अशीच भाषा बघणारानं केली तर खरं म्हणावं!

वाढत्या वयाचं लेणं लेत लाडाची लाडुबाई घरात रांगायला लागली, घुंगूरते पाय घेऊन पळायला लागली म्हनजे तिच्या कवतिकाला आमच्या घरी उधाण येत. आमच्या ताईला मुलगी झाली तर तिला खेळायला गावोगांच्या किती मावल्या आल्या. भाजक्या चूल उतरंडीचा रग्गड खेळ घरात आला. तऱ्हेतऱ्हेच्या गोंड्यांनी तिची लांबसडाक केसांची वेणी गुंफली गेली. जरतारी काठाची रेशमी पोताची परकर पोलकी शिवली गेली न्‌ भातुकलीचा अगर भोंडल्याचा घरातल्या ओसरीवर दणका उडून गेला. चवीधवीचे खाऊ खिरापतीला आले. निरनिराळ्या गीतांचे स्वर घुमले न्‌ आजोळ घराला जशी इंद्रसभेची शोभा आली. भातुकलीला तर सगळं गाव बघायला लोटावं अशी बारकाली-बारकाली भांडीकुंडी गोळा झाली. लेकीला जणू संसाराचा श्रीगणेशा शिकवला गेला. बरोबरच्या मुलीबाळींच्या सहवासात तिचं बालपण झोकात सजलं गेलं.
घरातली मुलगी म्हणजे काळजाचा घड. आज नाही उद्या ती सासरी जाणार. म्हणून तिचं कौतुक आणखीनच. देवादिकांनी ऊसमुळे, पानमळे आया मुलींना आंदण दिले तर आपणही काही भरघोस द्यावं हो हौस. त्यासाठी मुलगी वयात आल्यापासूनची तयारी. ऐपतीप्रमाणं देण्याघेण्याचा विचार. बरोबरीचा जावई शोधण्यासाठी धडपड. शिवाय

तुझ्या ग गालावरी कुणी ग गोंदले

फूल कुणी ग टोचले गुलाबाचे

लेकीच्या देखणेपणाबद्दलची ही हौस मौज मनात, त्यातून मग-

नवरी पाहू आले आले गडाचे गणपती

भांगतुऱ्या लक्ष मोती उषाताईंच्या

नवरी पाहू आले सोपा चढूनी अंगणी

नवरी शुक्राची चांदणी मैनाराणी

ठुश्या पेट्याखाली कंठ्याचे बारा सर

दिल्या घरी राज्य कर उषाताई

असली भाषा घरात निघालेली. जाई जुईच्या मांडवाची बोलणी चाललेली. आणखीन्‌-

गोरज मुहूर्त मुहूर्त पवित्र

उच्चारती मंत्र ब्रह्मवृंद

अशा सुख सोहळ्याचा विचार झालेला, वाजंत्री बोलाविलेली. पाच कळसांत न्हाणं धुणं व्हायचा बेत जुळवलेला. रुखवत सजवलेले. सवाष्णींनी गणगोतांसह देवदेवताना आमंत्रित करणारी गीतं गात हळद दळलेली. मुहूर्तमेढ पूजलेली. आंबा शिंपावा, घाणा भरावा, गौर पुजावी यातली आखणी झालेली. तर अशा धांदलीत शेलक्या वस्त्रालंकारांनी सुशोभित झालेली राधिका लगीन साज लेत बोहल्यावर आली की, आता ती परत घरी जाणार या कल्पनेनं काळीज हादरून जातं.
जरतारी पायघोळ साडी नेसलेली, गोऱ्या कपाळी कुंकवाची चिरी त्यालेली, वेणीवर मोगरीच्या कळ्या माळलेली, कोवळ्या नाकात सर्जाचे नथ घातलेली, बाजुबंद वेळा त्यालेली, तोडीचे वाक्या न्‌ कुलपाचा कंबरपट्टा घातलेली लाडकी लेक चार चौघींच्या कळपातून उठून जाणार म्हणून वारा डुरा झालेली जीव कसाबसा सावरीत आईवडील एक अंगाला उभे रहातात. जावयाला डोळे भरून पहातात. "आम्हा घरीचा पाळणा तुम्हा घरी बांधिला" म्हणत व्याही-विहिणींना विनवीत "बाळीला सांभाळा" म्हणतात.
अशा वेळी पतीबरोबर सात पावलं चालून त्याच्याबरोबर आपल्या घरी जायला उतावीळ झालेली मैना गृहलक्ष्मी होऊन उंबरठ्यावरचं माप ओलांडीत पुढं निघालेली असते. लहानपण मागं सरलेलं असतं. पोक्त पणानं घेरलेलं असतं, जबाबदारीनं माखलेलं असतं. माहेरघरचा विरह हलक्या पावलांनी मागं लोटीत उगवत्या चंद्राच्या भेटीला केव्हा जाईन या उत्सुकतेनं ती भुलून जाते... म्हणून हंड्या-झुंबरांच्या लखलखाटातील मांडव ओलांडून डोईवर जरीमंदील ल्यालेल्या, त्यात मानाचा तुरा खोवलेल्या, हळदीच्या गालावर काळी टिकली लावलेल्या, कपाळावर वर्खाचा मळवट माखलेल्या, अंगावर जरीकाठी उपरणं घेतलेल्या, अंगात कोट न्‌ पायात नवा जोडा घातलेल्या, शिरी बाशिंग लेवून ऐटबाज नजरेनं तिच्याकडे पहाणाऱ्या जीवन साथीबरोबर ती हळूहळू चाललेली असते... तिला

भरताराचं सुख हसत सांगे वालू

मुखीच्या तांदूळानं सर्जे नथीचं झालं लालू.

या सुखाची मालकीन केव्हा एकदा होईन झालेला असतं. .....
एवढचं नाहीतर-

जाई मोगऱ्याच्या कळ्या लाल भरजरी शेल्या

सांगा वहिनी तुम्हा गुंफीता कशा आल्या

संसार करायची अशी जिद्द तिनं ध्यानी मनी बाळगलेली असते, तिला स्वतःचं जग निर्माण करायचं असतं. "चंद्रानं केलं खळं, सूर्यानं केली खोपी न्‌ रावांच्या मांडीवर मी गेली झोपी " असला उखाणा घालीत आयुष्याचा अर्थ लावायचा असतो. शिवाय-

टिप्पूर चांदणं चांदण्याजोगी रात

शेजेच्या भ्रताराची देवासारखी सोबत

यातील गंमत चाखायची असते. राजलक्ष्मीचं वैभव उभं करीत जावानणंदात नाव कमवायचं असतं. शेरभर सोन्याचे अंलकार लेण्यापेक्षा ठसठशीत कुंकवाची मला गरज अधिक आहे हे तिला सिद्ध करायचं असतं. म्हणून मग ती ज्याला सांगून टाकते-

हिऱ्यामाणकांचं मला नाही भूषण

हळदीवैल कुंकू माझं जरीचं निशाण

आणि त्याच दिमाखानं आपल्या घरात प्रवेश करते. दिल्या घरी सुखानं राहिल पाहिजे ही आईच्या शिकविणीची बाळघुटी तिच्या संगती असल्यामुळे घरदार सावरताना आईचं प्यालेलं दूध तिच्या मनगटी खेळतं रहातं. सर्वाच्या मर्जीमाप तिचं वागणं बोलणं झाल्याकारणानं ती कुणाच्या नजरेला खुपत नाही का कुणाच्या टोचणीतही गवसत नाही. सासुरवासातले खाचखळगे हे राधा हसत मुखानं बुजवून टाकते.
होता होता ह्या राणीला दिवस जातात. तोंडावर गर्भाकाया उमटते न्‌ मग घरात आनंदी आनंद उसळून जातो, " डोहाळे कडक आहेत" यापलिकडे बोभाटा होत नाही. आवड निवड लक्षात घेऊन गाभुळली चिंच आणा, पिकलं कवठ आणा, गुलाबी पेरू मागवा, कोवळी वाळकं आणा, कोवळ्या वांग्याची भाजी करा, आवळे आणून द्या, थालीपीठे लावा असल्या कितीक गोष्टी कौतुकानं पुढं येतात. त्यामुळे आधीच उलट्या झाल्यानं अन्नाची शिसारी आलेली ही मैना आणखीनच लाजून चूर होते. आडभिंतीला बसून रानमेवा खातखात उदरी येणाऱ्या बाळराजाबद्दलची गोड चित्रं मनोमनी उभारते.
दरम्यानच्या काळातील सण उत्सव घरी झोकात साजरे होतात. दारी सडा सारवण येऊन तऱ्हेतऱ्हेची रांगोळी घातली जाते हळदकुंकवाची बोलावणी होतात. महानैवैद्य पुरणावरणाचा शिजतो. देवदेवतांची महापूजा बांधली जाते. सौभाग्यवाणाची देवघेव होत रहाते. पोरीचा जीव भरल्या निरीमुळे हाबकला जाऊ नये अगर भीतीन तिला घेरलं जाऊ नये म्हणून परोपरीनं तिची जोपा होते.
पाचव्या अगर सातव्या महिन्याचा मुहूर्त साधून कधी मळ्यातल्या केळीच्या बनातल्या मखरात बसवीत तर कधी रानातल्या झाडांना झोपाळा बांधून त्यावर बसवीत, कधी घरात वाडी भरून चौरंगावर बसवीत तर कधी नदीतल्या होडीत बसवीत अशी थाटामाठानं गणगोतांच्या सहवासात डोहाळजेवणं साजरी केली जातात. आवडी निवडीचे शिजवीत तिला धीर दिला जातो. हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, फुलांचा रंगी-बेरंगी साज तिच्या साठी आणून हौस मौजेने तिचं कौतुक मांडल जातं.

गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदार

उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार

या कल्पनेनं घरदार उल्हासून जातं. चांदण्या रात्री जेवणं होतात. जेणेकरून तिचं मन खुशीन रमेल ते सारे सोपस्कार पार पाडले जातात. सासरीमाहेरी अशी दुहेरी गुंफा मोठ्या आनंदानं पार पडते. अशावेळी-
राणीला डोहाळे कंताला काय कळे

रसलिंबू गळे बागेमधी

राणीला डोहाळे कंतानं जाणीयले

रुमाली आणीयेले बाल-आंबे

असली गंमत घडून आल्यामुळं त्यातली चव हिच्या मुखी आणखीनच सुखावते.
डोहाळ्याची गीते गात तिचं घरात झालेले जेवण तिला चांगलं मानवतं. आपल्या बाळाबद्दलची सुखस्वप्नं ती रंगवीत असते.
सडा घालून रांगोळी काढताना दाराशी गाईची पावलं मग ती अशी सुरेख काढते की, जणू तिच्या बाळाला ही पायघडी घालायला निघालीय म्हणावी! स्वस्तिक म्हणजे सूर्यदेवाची बैठक, तर ते काढताना हिच्या मनात आपल्या बाळाचं उज्ज्वल भवितव्य असायचं. म्हणून त्या भाग्य रेषा उमटताना तिचा जीव हारखायचा.
घरात सणासुदींचे दिवस आले की, महालक्ष्मीगत हिची सासू हिला पण हातावर सुवासाचा गंध माखायला लावायची. त्यामुळे घागरी फुंकताना तिचे ओठ हलायचे-

घागर घूमूदे घूमू दे

रामा पवा वाजू दे

चंदनाची उटी गवर माजी लेवू दे.

त्यामुळं सायासानं घरात उभ्या केलेल्या महालक्ष्मी प्रसन्न झालेल्या दिसायच्या. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायकांनी मग कौतुकानं म्हणावं, तुमच्या घरची ही लक्ष्मी सुखा समाधानाच्या पावलांनी आलीय! तुम्ही मोठ्या भाग्याच्या तशी सासू मालन हारखून जात खुशीन मान हलवणार. तिरक्या नजरेने सुनेला बघणार न्‌ रात्रीला मीठ मोहऱ्यांनी तिची नजर काढून टाकणार.
अशा वेळी कामकारणानं गावाला गेलेल्या वकीलाची वार्ता हिच्या ओठांवर घुमणार-

माळ्याच्या मळ्यामंदी केळी नारळी जावा जावा

मधी गुलाबा तुजी हवा वास घेणार गेले गावा

राणीचा गळा तर असा सुरेख की, ऐकणाराची तहानभूकच हरपून जावी... घरातल्या कामाधामाचा तर हिला उरक दांडगा. त्यामुळं तिकडून जाता येता ही गुणगुणणार-

कपाळीचं कुंकू बाई घामानं रंगलं

आत्तीचं ग माझ्या फूल जाईचं चांगलं

भरताराचं सुख जसं पुनवेचं चांदणं

हावशा कांत माझा जणु केवड्याचं पान

पण मग क्वचितच माहेर आठवलं की, हे साजणी कावरीबावरी झालीच म्हणावी. आई, वडील, भाऊ, बहीण, भावजय, भाचे मंडळी, काका, मावशी, चुलता, चुलती, आजी, आजोबा सगळे सगळे नजरेपुढं आले की, तिनं जाऊन येते आईकडं अशा घोकणी नवऱ्यापुढं घातलीच समजावी. मग इथला डामडौल किती पण असून दे ! तिथल्या सुखाची सर इथं नाही न्‌ इथल्याची तिथं नाही हे कळत असलं तरी तुलना सोडून देत ती आल्या गेल्याजवळ सांगावा देणारच की, कमानी दरवाजाच्या माझ्या माहेरी जाऊन आईला सांगा की, मला घेऊन जा म्हणावं! मग काय? शेलक्या वारूवर स्वार होऊन दादाराया येणार न्‌ ही पण चट्‌किनी दीड दोन दिवसांच्या बोलीनं का होईना जाणार म्हणजे जाणारच. अशावेळी पुरण पोळीची, लाडवाची नाही तर सजुरीची पाटीभर बुत्ती तिच्यासंगं येताजाताना जाणार. आणिक घरोघरी मैना आल्याची खूण म्हणून तिचं वाटपही होणारच. तशात नागारपंचमी यावी म्हणजे मग तर बघायलच नको. श्रावण मासातल्या रिमझिमत्या पाऊस काळात नागदेवांची पूजा करून माहेरी असलेल्या बंधुराजांचं उदंड चिंतायचं. आणि सासर घरच्या धनदौलतीचा, वाडवडिलांच्या रुपानं येणारे नागदेव, सांभाळ करतील म्हणून मनोभावे त्यांच्यापुढ नतमस्तक व्हायचं! ... घराण्याचे कुळाचार सांभाळायचे. नागांचा फणा दुखावेल म्हणून काही वाटायचं नाही, काही कुटायचं नाही, काही चिरायचंही नाही!... घरच्या वडिलधाऱ्यांच हे वळण उचलायचं ... तीच गोष्ट संक्रांतीची. नवीन गाडगी सुगडं-(ववसा) आणून धुवून घेत रंगवायची. या सुगडांना रंगीत पाटावर मांडून त्यात उसाचे गरे, ओल्या हरभऱ्याचे घोस, गाजराचे तुकडे, पावट्याच्या शेंगा, गव्हाच्या ओंच्या, शेंगदाणे असलं काय काय परीचं शेतात नव्यानं आलेले घालायचं. तीळगूळ घ्यायचा. पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून पाच सवाष्णींना सुगड देत घेत सौभाग्यवर्धन साधायचं घरची चालरीत सांभाळायची.
तर अशा कामात ही राधिका मोठी हुषार. एकदा पाहिल की ते लगेच ध्यानात घेईल. कृतीत आणील. म्हणून तिचं शहाणपण सर्वांच्या खात्रीत उतरतं न्‌ ती घरात सुगरण ठरते.
आता माणूस कितीही शहाणा असला तरी भांड्याला भांडं लागलं की, कुरबूर निघतेच. पण म्हणून डगमगून अगर रडत बसून होत नाही. उठता बसता नवऱ्याकडे कागाळी करून चालत नाही. जो भेटेल त्याच्या जवळ माहेरी सांगावा देऊन वातावरण पेटवता येत नाही. सार पाणी प्यावं त्या रीतीनं गिळावं लागतं

बंधुजी विचारीतो मैना सासुरवास कसा

चिताकाचा फासा रूतावा तसा

अगर

बरम्या लिवून गेला तसा
यातली पण वाटाघाट करून निभाव लागत नाही, म्हणून मग ही शहाणी विचार करते की, उद्या माझं बाळ माझा पांग फेडील. हसत मुखानं मी त्याला एकेकाच्या मांडीवर दिलं की, सगळ्यांचा राग खाली बसेल.
आणि ही गोष्ट खरी. लहानग्या बाळराजाच्या दर्शनानं माणूस झाल गेल विसरून जातो. मोकळ्या मनानं बाळाशी खेळतो. हा आपला कुलदिपक आहे या विचारानं कडीखांद्यावर घेत त्याची हौसेनं जोपा करतो.
घरातलं बाळराज म्हणजे जणु सोन्याचा ढीग, भलं दांडगं ऐश्वर्य. जिवाभावाचा विसावा. सासरमाहेरचे ऋणानुबंध जोडणारा सांधा. वडीलधाऱ्यांसकट सर्वांच सुख निधान.
म्हणून मग ही गर्भारपणातल्या त्रास आनंदान सहन करीत लवकरच जन्माला येणाऱ्या आपल्या राजबिंड्याच्या विचारात स्वतः हरवून बसते. बाळाचे डोळे कसे असतील, ओठ कसे असतील, हातपाय कसे नाचतील, आपल्याकडे बघत बघत आपल्या अंगावर पिताना बाळ कसं सुखावेल, आपली त्यावेळी ब्रह्मानंदी कशी टाळी लागेल. बाळाचं कौतुक सासरी माहेरी कोण्या रीतीनं केलं जाईल वगैरे वगैरे अनेक कल्पना तिच्या मनी घोळू लागतात...
त्यामुळं आपला बाळ कुणासारखा दिसेल या विचारात असताना ते थोरामोठ्यांची आठवण करते. देवदिकांच्या पूजेत रमते. वडीलधाऱ्यांच्या विचारात रहाते. पतीदेवाच्या गुणरूपात गुरफटून घेते न्‌ मग अखेर शेवटी माझं बाळ कृष्णदेवाच्या रूपानं येऊंदेल या कल्पनेत विसावते. त्या कारणानं उदरातील बाळाचा भार पेलीत वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना ती बाळाला आशीर्वाद मागते. एवढच नाही तर आपलं आयुष्य उणं करीत बाळाचं वाढूं दे म्हणून देवापाशी मागणं मागीत तुळशीला प्रदक्षिण घातले... अशा वेळी ढुश्श्या मारीत तिचं बाळ तिला सांगून टाकतं की, `थांब, मी कोण आहे ते तुला लौकरच दाखवतो '.... त्यासरशी ती अशी खुदकिनी हसते की, जणू तीच यशोदा न्‌ देवकी झालीय म्हणावी!