Tuesday, November 30, 2010

आनंददूत !!!

या पावसाच काही खर नाही सांगतो तुला
त्याला सगळ कळत असाव बहुधा
तुझ असणं..नसणं...असुनही नसणं
अन हो आजकालच तुझ नसुनही असणं....
या सगळ्याचे त्याचेही अडाखे असावेत बहुधा...
तु असतांना त्याच थुई-थुई नाचणं
वार्‍याला न जुमानता तुझ्यावर रेंगाळणं
मी एकटाच असतांना मात्र असंबद्ध वागणं
वळीवाच्या नावाने पटकन निघुन जाणं
हा सगळा माझ्यासाठी जुलुमच होता गं......
पण तुला आठवतय ...आपली पहीली भेट..
त्या दिवशी तो जसा वागला होता
जसं निर्जन बेटावर अल्लाउद्दीन भेटावा दिव्यासहीत
त्यानं त्यादिवशी जे जपल न तुझ्या-माझ्या कहाणीला
तेंव्हाच मी ठरवल ....
यानं काहीही केल तर तक्रार नाही ...
अन आजकाल तर तो
तुझ्याच कहाण्या मला नव्याने सांगतो
तुझ्याच कविता ओल्या करुन पुढ्यात टाकतो
अचानक मी का कोरडा झालो म्हणुन रागावतो
अन येता-जातांना बरच काही सांगत असतो.....
आयुष्यातल्या चढ-उतारांची आपली जागा आहे
आनंदाच गाणही आपलच अन आपलाच त्रागा आहे...वगैरे
तुझे-माझे सप्तरंगी तुषार आता भलेही नाहीत त्याच्याकडे
पण त्याच्याबरोबर एकट बरसण्यालाही भरपुर जागा आहे...
खरच.. मला आता कबुल करावच लागेल....
तो आनंददूतच आहे ........
माझ्या सारख्यांसाठी !!!!!!!!!!!!!!!!

1 comment:

  1. ही पण गिरीश कुलकर्णींची कविता आहे. तुम्ही त्यांना ओळखता का? इथे टाकण्यापुर्वी त्यांना विचारले होते का?
    http://www.maayboli.com/node/10944

    ReplyDelete