Wednesday, June 8, 2011
स्त्री व सृष्टी
वर्षां संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य व सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. आज पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री व सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं. उद्या जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्त काही विशेष लेख-
पर्यावरण दिन दरवर्षीच येतो आहे. ‘सृष्टी वाचवा’ अशी हाकही जगाच्या कोपऱ्यांतून पुन:पुन्हा येते आहे. पण काही किरकोळ अपवाद वगळता ही हाक बहुतांशी फोल ठरते आहे. या हाकेला उत्तर देण्याची जबाबदारी फक्त शासनकर्त्यांची नव्हे, हे फक्त पर्यावरणवादी मंडळींचं राखीव क्षेत्रही नव्हे, तुमच्या-माझ्या प्रत्येकाच्याच रक्तातले अंत:प्रवाह या हाकेनं खळखळून वाहायला हवेत. पण सृष्टीची ही हाक ऐकून खरं जर कुणाचं भान जागं व्हायचं असेल तर ते आपल्या अधिकारांसाठी ठामपणे झगडणाऱ्या, कर्तृत्वाची अनेक क्षितिजं पार करत आभाळापर्यंत पोहोचणाऱ्या स्त्रीचं. याचं कारण, तीच सृष्टीची लेक आहे- सर्जनशील आणि सोशिक, कणखर आणि क्षमाशील, सुपीक, समृद्ध आणि संपूर्ण विश्वाला पोसणाऱ्या आणि विश्वाचा भार पेलणाऱ्या भूमीची ती समानधर्मा आहे.
सृष्टीच्या आणि स्त्रीच्या, भूमीच्या आणि स्त्रीच्या एकरूपतेची ही खूण आज एकविसाव्या शतकातल्या स्त्रीच्या मनातून कदाचित पुसली गेलीही असेल. विस्तीर्ण अवकाशात झेपावताना भूमीशी असलेल्या नात्याचा विसर तिला पडलाही असेल. तिनं थोडं मागे वळून बघितलं तर तिला अगदी सहज पटेल तिची ही ओळख. तिनं जपू नये जाचक पारंपरिकता, तिनं अडकू नये कर्मकांडात, व्रतवैकल्यं पार पाडून तिनं झिजवू नये स्वत:ला आणि सण-उत्सवांमधल्या उपचारांचं अंधानुकरणही करू नये तिनं. पण या परंपरेमागचा अर्थ आणि त्या अर्थाच्या मुळाशी असलेलं स्त्री आणि भूमी यांच्यातलं साधम्र्य तर तिनं नक्की जाणून घ्यावं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्वत:ला सिद्ध करू पाहताना आणि पर्यावरणाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधतानाही हे साधम्र्य कदाचित तिचं आंतरिक सामथ्र्य वाढवू शकेल.
आजच्या विज्ञाननिष्ठ युगात स्त्री-पुरुष समानतेचा आणि पर्यावरणपूरक अशा शाश्वत विकासाचा पाया रचताना प्राचीन परंपरेकडे डोळेझाक करणं कुणालाच श्रेयस्कर ठरणार नाही. कारण संस्कृतीची वाटचाल सुरू राहते तीच मुळी नव्या जुन्यांच्या संघर्ष आणि समन्वयातून. डॉ. इरावती कर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ही सतत स्वीकाराची प्रक्रिया आहे. एका गोष्टीचा स्वीकार आणि दुसरीचा कायमचा त्याग, असा प्रकार संस्कृतीच्या घडणीत कधी दिसून येत नाही.’ त्यांनी जिला ‘नवस्वीकृती’ (aglomeration) म्हटलं आहे, ती ही प्रक्रिया स्त्री आणि पर्यावरण या दोहोंसाठी तर अधिक पोषक आहे. प्राथमिक कृषिजिवी समाजातलं स्त्री आणि सृष्टी यांच्यातलं साहचर्य आज डोळसपणानं समजून घेण्याची गरज आहे, ती यासाठी.
ज्या काळात अन्न हीच जगण्याची मुख्य प्रेरणा होती, त्या काळात नवनिर्मितीची शक्ती असलेल्या भूमीला आणि त्याच शक्तीमुळे अर्भकाला जन्म देणाऱ्या स्त्रीला लोकमानसात गौरवाचं स्थान होतं. भूमीप्रमाणेच सर्जनशील, उदार, सोशिक, अनाग्रही आणि समर्पणशील असलेली स्त्री हीच त्या समाजाचा केंद्रबिंदू होती. तिला निर्णयाचं स्वातंत्र्य होतं. जमिनीला न दुखावता तिच्यातून उत्पादन घेणं, त्या उत्पादनाचं कुळात- समूहात वाटप करणं आणि समूहाचं व्यवस्थापन करणं हे स्त्रीचेच अधिकार होते. शेतीचा शोधच मुळी तिनं लावला. नांगराच्या मदतीनं शेतीला सुरुवात होण्यापूर्वी शेतीची सगळी कामं स्त्रीच्या पुढाकारानंच होत होती.
सर्जनाचं नेमकं मर्म जाणणाऱ्या स्त्रीच्या आणि भूमीच्या साहचर्यामुळे भूमी आपल्याला अन्नधान्याची समृद्धी देते, अशी श्रद्धा त्या आदिम समूहांच्या मनात साहजिकच निर्माण झाली आणि म्हणून या लोकमानसानं स्त्रीला भूमीरुपात पाहिलं. भूमीला स्त्रीमध्ये बघून भूमीच्या सुफलीकरण विधींचा अधिकार स्त्रीकडे सोपविला. नागपंचमी आणि श्रावणातली विविध व्रतं, गौर-गणपती, नवरात्र, भोंडला, भुलाबाई, इनाई, भराडी गौर, शांकभरी, वसंतोत्सव, चैत्रगौर, अक्षयतृतीया, कानबाई यांसारख्या भारतभर सगळीकडे विविध प्रकारे साजऱ्या होणाऱ्या सण-उत्सव आणि व्रतवैकल्यांमागे जमिनीची सुफलनाची शक्ती वाढावी, ही प्राथमिक कृषिजीवी संस्कृतीची श्रद्धाच आहे. जिच्याजवळ उदंड निर्मितीक्षमता आहे, अशा स्त्रीनं भूमीच्या समृद्धीसाठी प्रतिकात्मक विधी करण्याची प्रथा शेतकरी समाजात आजही टिकून आहे. भरपूर पीकपाणी यावं म्हणून पेरणीची सुरुवात स्त्रीनं करावी, असा संकेत आहे. तिफणीची पूजा तिच्या हस्तेच केली जाते. झाडाचं पहिलं फळ स्त्रीला दिलं जातं.
संपूर्ण आयुष्य निसर्गाशीच बांधलेलं असल्यामुळे आणि स्वत: सर्जनक्षम असलेली स्त्री सृष्टीच्या निर्माणक्षमतेला न दुखावता मानवी जीवन समृद्ध करेल, असा विश्वास असल्यामुळे वेदपूर्व आणि वेदकाळातही स्त्रीचं सामथ्र्य आणि सृष्टीचं आरोग्य अबाधित राहिलं. स्त्रियांनीच राखलेली आणि फक्त स्त्रियांनाच प्रवेश असणारी सहा-आठ हजार वर्षांपूर्वीची मातृवनं असोत, भूमी रजस्वला आहे, असं मानून शेतीची कामं चार दिवस बंद ठेवणारा अंबुवाची उत्सव असो किंवा नदीची खणा-नारळानं ओटी भरण्याची प्रथा असो, परंपरेतल्या या सगळ्या संकेतांमागे स्त्री आणि सृष्टी यांच्या नात्याची घट्ट वीण आहे. तसंच स्त्रीला उपजत असलेलं निसर्गाच्या रक्षणाचं व संवर्धनाचं अचूक भान आहे.
माणसाची वैज्ञानिक दृष्टी जसजशी विकसित होत गेली आणि बी पेरल्यापासून धान्य तयार होण्यापर्यंतची प्रक्रिया त्याला जेव्हा नेमकी उमगली, तेव्हा निसर्ग जपण्यासाठीच्या या सगळ्या पारंपरिक संकेतांचा गाभा असलेली श्रद्धा हरवली. जीवनशैलीचा सहज आणि अटळ भाग असलेल्या चालिरितींना धार्मिक उपचारांचं स्वरूप आलं. आजचे सण, उत्सव, व्रतवैकल्यं ही सत्त्व नष्ट झालेल्या फोलपटांसारखी वाटू लागतात, ती यामुळे. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आणि त्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना स्त्री आणि सृष्टी यांच्यातल्या या नात्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं.
हे करायचं तर तिला परत मागच्या दिशेनं वाटचाल करण्याची गरज नाही. सृष्टीचं मर्म तिला उमगलेलं आहेच. निसर्गसंवर्धनाची परंपरेनं मिळालेली जाणीव तिच्या रक्तातून वाहते आहेच. पण आजच्या काळाला अनुरुप असा या जाणिवेचा मुक्त आविष्कार आता दिसायला हवा. तिनं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला भवतालाशी पुन्हा एकदा जोडून घ्यायला हवं. घरगुती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्यापासून ते पाणी, इंधन वाचवणं आणि परिसरातील हिरवाई टिकवणं-वाढवणं यासाठी तिला वेगळा वेळ देण्याचीही गरज नाही. कर्तृत्वाच्या इतर क्षेत्रात भरारी मारतानाही तिनं भूमीशी, सृष्टीशी असलेल्या नात्याची प्रखर जाणीव ठेवली तरी बदल घडू शकतो. ‘स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं’, असं म्हटलं जातं. तसंच निसर्ग संवर्धनाची दृष्टी घरातल्या स्त्रीनं बाळगली तर कुटुंबाची आणि पर्यायानं समाजाची जीवनशैलीही पर्यावरणपूरक होऊ शकते.
अर्थात, पर्यावरणाच्या आजच्या अनेक प्रश्नांचं स्वरूप पाहता, केवळ व्यक्तिगत प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, हेही खरंच. म्हणून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधासाठी किंवा त्यांच्या हक्कांसाठी उभी राहणारी संघटित ताकद पर्यावरणावर घाला घालणाऱ्या शासकीय धोरणांच्या आणि प्रकल्पांच्या विरोधातही आता उभी राहायला हवी. स्थानिक वाणांचं उच्चाटन करून या मातीला आणि इथल्या समृद्धीला लुटणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात लढणाऱ्या आणि ‘नवधान्य’ कार्यक्रमाद्वारे स्त्री आणि सृष्टीला नवचैतन्य देऊ पाहणाऱ्या डॉ. वंदना शिवा असोत, आफ्रिकेतल्या हरित चळवळीची अध्वर्यू वांगारी माथाई असोत किंवा विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडणाऱ्या प्रकल्पांविरुद्ध लढा देताना जिला स्वत:चं बलिदान द्यावं लागलं, ती ‘ग्रीन पीस’ संघटनेची प्रणेती पेट्रा केली असो, या सगळ्यांनी सृष्टीची हाक ऐकली आहे आणि आपापल्या पद्धतीनं त्या हाकेला मन:पूर्वक उत्तरही दिलं आहे. आता तुमच्या-माझ्यासारख्या प्रत्येकीनं असंच ठाम पाऊल उचलायला हवं.
Sunday, June 5, 2011
बहुगुणी अभ्यंगस्नान
दिवाळीतील अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेल चोळून, उटणे लावून भल्या पहाटे अभ्यंगस्नान होते. या स्नानामुळे त्वचेबरोबरच मनालाही तजेला मिळतो.
अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग’.
मसाजचे विविध प्रकार आहेत. त्यात नुसताच विशिष्ट भाग चेपणे, चापट्या, थोपटल्याप्रमाणे स्ट्रोक देणे हे विशिष्ट प्रकार काही तक्रारी दूर करायला चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे जिरेपर्यंत सर्वांगाला तेल चोळून लावणे, ही झाली “अभ्यंग स्नेहल चिकित्सा’.
आयुर्वेद म्हणते, सर्वांगाला तेलाने मालिश केल्याने शरीर बळकट होते व त्वचा नितळ व निरोगी राहते. सकाळी आंघोळीपूर्वी अर्धा तास अंगाला तेल चोळून लावावे. त्वचेची रंध्रे उतरत्या कौलासारखी वरून खाली झुकणाऱ्या दिशेने असतात. त्यामुळे तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावे, हे त्यासाठीच म्हटले आहे. संपूर्ण शरीराला लावायला 2 मोठे चमचे (अंदाजे 30 मिली.) तेल पुरते. संपूर्ण शरीराला तेल लावून जिरवायला 15 ते 20 मिनिटे पुरतात. नंतर तेवढाच वेळ थांबून आंघोळ करायला हरकत नाही. पोटाची तक्रार असताना किंवा आजारपणात अभ्यंग करू नये.आपल्या त्वचेचे तीन भाग असतात. बाह्य त्वचा म्हणजे आपल्याला दिसणारी. ती तुकतुकीत, लवचिक व उजळ असावी. बाह्य त्वचेवर सतत मृतपेशी व मृतत्वचेचा लेप चढत असतो. मालिशमुळे तो निघतो. रंध्रे मोकळी होतात व तेथील श्वासोच्छवास चालू राहतो. त्या आतील भागात असतात महत्त्वाच्या ग्रंथी. जसे घाम पाझरणाऱ्या, तेल पाझरणाऱ्या, संवेदना पोचवणारे मज्जातंतू. मसाजने येथील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायूचा व पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. निरुपयोगी तत्त्वे बाहेर फेकली जातात. त्या आतील भागात असतो मेदाचा थर. ज्यावर त्वचा विसावली असते. तेल मेदाच्या थरात शिरून तेथील शिथिलता घालवून तो कार्यक्षम व लवचिक बनवते. त्यामुळे त्वचा निबर व निस्तेज दिसत नाही.
परदेशात मसाज पार्लर्स असतात. तेथे सगळे शरीर रगडून देतात. त्यामुळे ताणतणाव नष्ट होऊन नवचैतन्य येते, असे म्हणतात. आपल्याकडेही बाळ-बाळंतिणीला, पैलवानांना गेलेली शक्ती भरून निघण्यासाठी मसाज करण्याची पद्धत आहे. आपल्याला काही दररोज अभ्यंगाला वेळ नसतो हे खरे आहे. रात्री झोपताना निदान डोक्याला व तळपायाला तरी तेल चोळून लावावे. त्याने थोडे तरी फायदे मिळतात. आठवड्यातून एकदा तरी सर्वांगाला अभ्यंग करावे.
निरनिराळ्या तेलबियांपासून त्या त्या गुणाची तेले मिळतात. जसे एरंड, करंज, कडुलिंब अशी अळाद्य, तर शेंगदाणा, बदाम, ऑलिव्ह, खोबरेल, तीळ अशी खाद्य तेले; पण अभ्यंगाला तिळाचे तेल उत्तम. खरंतर तेल नावच त्यावरून आले “तिलोद्भवं तेलम’ म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले हे तेल. आयुर्वेदाला तिळाच्या तेलाचे कौतुक फार. स्वाभाविकच आहे म्हणा. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते. चोळून लावताना उष्णता व घर्षणामुळे ते त्वचेत शिरते शरीरात सर्वत्र पोचून नंतर पचते व ताण शिथिल करते. शरीरातील घटकांना वंगण पुरवते.
तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे, तिचे गुण आत्मसात करते. अशी वनस्पती हवी. जी तीळ तेलाचे गुण वाढवेल, दोष कमी करेल व त्वचेला फायदे देईल. खरं तर तेल हे नाव त्यावरूनच आले. “”तिलोद्भव तैलम” म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले ते तेल; पण हल्ली तेलातील भेसळ हा प्रकार सर्रास झालाय. ती रोखावी म्हणून भारत सरकारने “ऍगमार्क’ ही प्रणाली आणली. ऍगमार्कला भारत सरकारची दर्जा व “शुद्धतेची हमी’ असे म्हणतात. तिळाचे तेल घेताना त्यावरील ऍगमार्क चिन्हे पाहूनच घ्यावे.
खाद्य तेलाची भेसळ, टंचाई व महागाई यावर उपाय म्हणून केरळमध्ये “करंजेल’ या अखाद्य तेलात वात लावून दीपोत्सव साजरा करतात. बरे, करंज तेल जंतूनाशकही आहे. त्यामुळे वातावरणही शुद्ध राहते.
उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहिशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
शरीराचे तापमान व आंघोळीसाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान सारखे असावे. म्हणून अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. आंघोळीनंतर स्वच्छ, कोरड्या टॉवेलने अंग खसखसून पुसावे. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकीत्सा. अगदी दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.
अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग’.
मसाजचे विविध प्रकार आहेत. त्यात नुसताच विशिष्ट भाग चेपणे, चापट्या, थोपटल्याप्रमाणे स्ट्रोक देणे हे विशिष्ट प्रकार काही तक्रारी दूर करायला चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे जिरेपर्यंत सर्वांगाला तेल चोळून लावणे, ही झाली “अभ्यंग स्नेहल चिकित्सा’.
अभ्यग्डे मार्दवकरः
कफवातनिरोधनः ।
धातूनां पुष्टिजननो

कृशानां बृहणाय स्थूलानां ।कर्शनाय च तैलमेव अलम ।।
म्हणजे कृष शरीर पुष्ट होण्याकरिता व स्थूल शरीर कृष होण्याकरिता तेल हे एकच पुरेसे आहे. हे आयुर्वेदात म्हणूनच म्हटले असेल.परदेशात मसाज पार्लर्स असतात. तेथे सगळे शरीर रगडून देतात. त्यामुळे ताणतणाव नष्ट होऊन नवचैतन्य येते, असे म्हणतात. आपल्याकडेही बाळ-बाळंतिणीला, पैलवानांना गेलेली शक्ती भरून निघण्यासाठी मसाज करण्याची पद्धत आहे. आपल्याला काही दररोज अभ्यंगाला वेळ नसतो हे खरे आहे. रात्री झोपताना निदान डोक्याला व तळपायाला तरी तेल चोळून लावावे. त्याने थोडे तरी फायदे मिळतात. आठवड्यातून एकदा तरी सर्वांगाला अभ्यंग करावे.
निरनिराळ्या तेलबियांपासून त्या त्या गुणाची तेले मिळतात. जसे एरंड, करंज, कडुलिंब अशी अळाद्य, तर शेंगदाणा, बदाम, ऑलिव्ह, खोबरेल, तीळ अशी खाद्य तेले; पण अभ्यंगाला तिळाचे तेल उत्तम. खरंतर तेल नावच त्यावरून आले “तिलोद्भवं तेलम’ म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले हे तेल. आयुर्वेदाला तिळाच्या तेलाचे कौतुक फार. स्वाभाविकच आहे म्हणा. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते. चोळून लावताना उष्णता व घर्षणामुळे ते त्वचेत शिरते शरीरात सर्वत्र पोचून नंतर पचते व ताण शिथिल करते. शरीरातील घटकांना वंगण पुरवते.
तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे, तिचे गुण आत्मसात करते. अशी वनस्पती हवी. जी तीळ तेलाचे गुण वाढवेल, दोष कमी करेल व त्वचेला फायदे देईल. खरं तर तेल हे नाव त्यावरूनच आले. “”तिलोद्भव तैलम” म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले ते तेल; पण हल्ली तेलातील भेसळ हा प्रकार सर्रास झालाय. ती रोखावी म्हणून भारत सरकारने “ऍगमार्क’ ही प्रणाली आणली. ऍगमार्कला भारत सरकारची दर्जा व “शुद्धतेची हमी’ असे म्हणतात. तिळाचे तेल घेताना त्यावरील ऍगमार्क चिन्हे पाहूनच घ्यावे.
खाद्य तेलाची भेसळ, टंचाई व महागाई यावर उपाय म्हणून केरळमध्ये “करंजेल’ या अखाद्य तेलात वात लावून दीपोत्सव साजरा करतात. बरे, करंज तेल जंतूनाशकही आहे. त्यामुळे वातावरणही शुद्ध राहते.
उद्वर्तनं कफहरं मेदोघ्नं शुक्रदं परम ।
बल्यं शोणित कृच्चापि
त्वकप्रसाद मृदुत्वकृत ।।
दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमोजोबलप्रदम ।
कण्डूमलश्रमस्वेदतन्द्रा तृड्दाहपाप्ननुत ।।
स्नान हे आरोग्यदायी आहे. खाज, मळ, घाम इ. पातकांचा ते नाश करते.शरीराचे तापमान व आंघोळीसाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान सारखे असावे. म्हणून अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. आंघोळीनंतर स्वच्छ, कोरड्या टॉवेलने अंग खसखसून पुसावे. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकीत्सा. अगदी दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी.
फरक कुठे पडला आहे..........
लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|
लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|
तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|
लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|
कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|
जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
पावसात ओलावा हा जास्त च..
आई च्या हातची भाजी..
डोकं पुसणारी आई..
छत्री घेवून येणारे बाबा.. बरोबर कि नाही...
ते दिवस किती छान वाटतात ....
ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....
कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???
त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...
बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात
१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....
कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???
त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...
बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात
१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......
बाबा काठी टाकून द्या
काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला पुढच्या चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”
” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “
” बाबा, मला कात्रजला जायचं. “
” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “
“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “
” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.
सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?
मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.
पण………….
कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.
का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?
बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते. का ?
सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.
त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?
यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!
बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”
” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “
” बाबा, मला कात्रजला जायचं. “
” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “
“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “
” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.
सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?
मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.
पण………….
कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.
का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?
बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते. का ?
सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.
त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?
यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!
बैल आणि मी
मागे एकदा मी न्यायालयाने ‘ बैलगाडा शर्यती ’ वर घातलेल्या बंदीचा निषेध नोंदवताना “ बैलगाडा शर्यत ” हा लेख लिहिला होता. तेव्हा मी बैलाच आणि शेतकऱ्याच नातं किती जिव्हाळ्याच असतं यावर लिहिण्याच नक्की केलं होतं.
मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट. आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काश्तीच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथून आम्ही चांगला उंचापुरा, खिल्लारी जातीचा बैल विकत घेतला. त्याची शिंगही लांबलचक आणि अणकुचीदार. माझा तेव्हाचं वय विशीच. त्याचं नाव मी राजा ठेवलं.
गावाकडची जनावर शेतकऱ्यांच्या सहवासात वावरणारी. नेहमी धोतर, सादर आणि पागोटं पाहणारी. त्यांना शहरी पेहरावाची प्यांट शर्टची सवय नसते. सहाजिकच ते शहरी माणसाला जवळ फिरकू देत नाहीत.
पण राजानं मला स्विकारलं. त्याला वैरण टाकणे, पाणी पाजणे, पेंड घालणे, हि काम मीच करायचो. त्याला नांगराला, औताला, बैलगाडीला जुंपण्याच कामही मलाच कराव लागायचं.
त्याचं आणि माझ एवढ मेतकुट जमलं कि तो माझ्य्शिवाई कुणालाही हात लावू देईना. अगदी माझ्या चुलत्यांनाही. माझे चुलते त्याला वैरण घालायला गेले कि त्याने शिंग उगरलच म्हणून समजावं. पण माझ्या त्याच्यात कुठलं नातं निर्माण झालं होतं कुणास ठाऊक. मी मात्र त्याच्या अवती भवती बिनधास्त वावरायचो .
आमच्याकडे संध्याकाळी बैलांना गव्हाची कणीक खाऊ घालायची परंपरा होती. पण राजाला कणीक खाऊ घालायचं कामही मलाच करावं लागायचं. मीही अगदी पोटच्या मुलाला आईनं भरवाव तसं त्याला भरवायचो. त्याच्या पुढ्यात बसायचो. कणकेचे बारीक मुठीएवढे गोळे करायचो. आणि अगदी त्याच्या मुखात घास द्यायचो. त्याच्या रखरखीत जिभेचा स्पर्श मला अगदी मोरपिसासारखा वाटायचा.
मी तसा शहरातच लहानाचा मोठा झालेलो. गावाशी माझं नातं सुट्टी पुरतंच. शाळा असो अथवा सुट्टी असो पण आईचा ओरडून घसा बसेपर्यंत मी काही अंथरुणातून बाहेर निघायचं नाव घेत नसायचो. आणि रात्री एकदा अंथरुणात झोकून दिल्यानंतर सकाळी सूर्य चांगला हातभार वरती येई पर्येंत उठायचो नाही. हि सगळी झोप अगदी गाढ असायची. इतकी कि कुंभकर्णानही आम्हाला लवून मुजरा करावा.
पण इथं राजाच्या सहवासात माझ्या झोपेतला गाढपणा कुठं हरवला कुणास ठाऊक. गावाकडे मला राजाची काळजी असायची. माझ्या चुलत्यांना आम्ही आण्णा म्हणायचो. त्यांना राजा जवळपासही फिरकू द्यायचा नाही. मग त्याला रात्री दोन वाजता, पहाटे पाच वाजता वैरण टाकण्याचं काम कोण करणार ? सहाजिकच राजासाठी रात्री अपरात्री उठण्याची वेळही माझ्यावरच आली. इतके दिवस अखंड गाढ झोपेची सवय. पण इथं राजासाठी मी ठरल्यावेळी न चुकता उठायचो. कोणीही आवाज दयावा लागायचा नाही. पण जाग आल्यावर घड्याळात पाहिलं तर बरोबर रात्रीचे दोन किवा पहाटेचे पाच वाजलेले असायचे.
आठ महिन्यात मला नौकरी मिळाली आणि मी पुन्हा पुण्यात परतलो. राजाला कुणास ठाऊक, कशी पण भनक लागली होती. त्याचे डोळे भरून आलेले होते. त्याच्यातला उत्साह मावळला होता. पुढ्यातली वैरण दातातही धरत नव्हता.
माझी अवस्थाही त्याच्यासारखीच झालेली. त्याची आणि माझी भेट मी पुन्हा मोठ्या सुट्टीवर आल्यावरच होणार होती. मी त्याला जड अंतकरणानं वैरण आणि पाणी करीत होतो. निघायच्या आदल्या दिवशी त्याला तेलात माळून कणीक खाऊ घालायला गेलो पण पठ्ठ्यानं एक घास शिवला नाही. त्या रात्री मीही जेवलो नाही.
दुसऱ्या दिवशी मी पहाटेच निघलो, कुणास ठाऊक कसं पण मी दूर निघाल्याच त्याला कळलं होतं. मी घराबाहेर पाउल टाकताच तो गोठ्यात चटदिशी उभा राहिला. दावणीला जोर देऊ लागला. त्याची तडफड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मनात कालवाकालव झाली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडलो. पाय निघत नव्हता तरी निघालो. शहरात आलो नौकरीत रमलो एक यंत्र झालो. बर्याच महिन्यानंतर गावाकडे आलो. पहातोय तर राजा दावणीला नाही.
आण्णांना विचारलं तर म्हणाले,” आरं, तू गेलास आणि बाईलीच कुणालाच हात लावू दिईना. वैरण आमी लांबूनच घालयचो, आणि पाणी सुदिक लांबूनच दावायचो. पण दावणीतून सोडून कामाला जुपायाची काय आमची हिम्मत हुईना. आखरी त्याच्या मूळ मालकाला सांगावा धाडला. घेतल्या कि मतीला दोन हजार रुपय खोत खावून दिवून टाकला.”त्यानंतर कितीतरी वर्ष सुट्टीला गावी गेलो कि राजाच्या रिकाम्या दावणीकड मी पहायचो आणि त्याच्या माझ्यातलं एक नातं माझ्या मनात गजबजून यायचं.
मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट. आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काश्तीच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथून आम्ही चांगला उंचापुरा, खिल्लारी जातीचा बैल विकत घेतला. त्याची शिंगही लांबलचक आणि अणकुचीदार. माझा तेव्हाचं वय विशीच. त्याचं नाव मी राजा ठेवलं.
गावाकडची जनावर शेतकऱ्यांच्या सहवासात वावरणारी. नेहमी धोतर, सादर आणि पागोटं पाहणारी. त्यांना शहरी पेहरावाची प्यांट शर्टची सवय नसते. सहाजिकच ते शहरी माणसाला जवळ फिरकू देत नाहीत.
पण राजानं मला स्विकारलं. त्याला वैरण टाकणे, पाणी पाजणे, पेंड घालणे, हि काम मीच करायचो. त्याला नांगराला, औताला, बैलगाडीला जुंपण्याच कामही मलाच कराव लागायचं.
त्याचं आणि माझ एवढ मेतकुट जमलं कि तो माझ्य्शिवाई कुणालाही हात लावू देईना. अगदी माझ्या चुलत्यांनाही. माझे चुलते त्याला वैरण घालायला गेले कि त्याने शिंग उगरलच म्हणून समजावं. पण माझ्या त्याच्यात कुठलं नातं निर्माण झालं होतं कुणास ठाऊक. मी मात्र त्याच्या अवती भवती बिनधास्त वावरायचो .
आमच्याकडे संध्याकाळी बैलांना गव्हाची कणीक खाऊ घालायची परंपरा होती. पण राजाला कणीक खाऊ घालायचं कामही मलाच करावं लागायचं. मीही अगदी पोटच्या मुलाला आईनं भरवाव तसं त्याला भरवायचो. त्याच्या पुढ्यात बसायचो. कणकेचे बारीक मुठीएवढे गोळे करायचो. आणि अगदी त्याच्या मुखात घास द्यायचो. त्याच्या रखरखीत जिभेचा स्पर्श मला अगदी मोरपिसासारखा वाटायचा.
मी तसा शहरातच लहानाचा मोठा झालेलो. गावाशी माझं नातं सुट्टी पुरतंच. शाळा असो अथवा सुट्टी असो पण आईचा ओरडून घसा बसेपर्यंत मी काही अंथरुणातून बाहेर निघायचं नाव घेत नसायचो. आणि रात्री एकदा अंथरुणात झोकून दिल्यानंतर सकाळी सूर्य चांगला हातभार वरती येई पर्येंत उठायचो नाही. हि सगळी झोप अगदी गाढ असायची. इतकी कि कुंभकर्णानही आम्हाला लवून मुजरा करावा.
पण इथं राजाच्या सहवासात माझ्या झोपेतला गाढपणा कुठं हरवला कुणास ठाऊक. गावाकडे मला राजाची काळजी असायची. माझ्या चुलत्यांना आम्ही आण्णा म्हणायचो. त्यांना राजा जवळपासही फिरकू द्यायचा नाही. मग त्याला रात्री दोन वाजता, पहाटे पाच वाजता वैरण टाकण्याचं काम कोण करणार ? सहाजिकच राजासाठी रात्री अपरात्री उठण्याची वेळही माझ्यावरच आली. इतके दिवस अखंड गाढ झोपेची सवय. पण इथं राजासाठी मी ठरल्यावेळी न चुकता उठायचो. कोणीही आवाज दयावा लागायचा नाही. पण जाग आल्यावर घड्याळात पाहिलं तर बरोबर रात्रीचे दोन किवा पहाटेचे पाच वाजलेले असायचे.
आठ महिन्यात मला नौकरी मिळाली आणि मी पुन्हा पुण्यात परतलो. राजाला कुणास ठाऊक, कशी पण भनक लागली होती. त्याचे डोळे भरून आलेले होते. त्याच्यातला उत्साह मावळला होता. पुढ्यातली वैरण दातातही धरत नव्हता.
माझी अवस्थाही त्याच्यासारखीच झालेली. त्याची आणि माझी भेट मी पुन्हा मोठ्या सुट्टीवर आल्यावरच होणार होती. मी त्याला जड अंतकरणानं वैरण आणि पाणी करीत होतो. निघायच्या आदल्या दिवशी त्याला तेलात माळून कणीक खाऊ घालायला गेलो पण पठ्ठ्यानं एक घास शिवला नाही. त्या रात्री मीही जेवलो नाही.
दुसऱ्या दिवशी मी पहाटेच निघलो, कुणास ठाऊक कसं पण मी दूर निघाल्याच त्याला कळलं होतं. मी घराबाहेर पाउल टाकताच तो गोठ्यात चटदिशी उभा राहिला. दावणीला जोर देऊ लागला. त्याची तडफड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मनात कालवाकालव झाली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडलो. पाय निघत नव्हता तरी निघालो. शहरात आलो नौकरीत रमलो एक यंत्र झालो. बर्याच महिन्यानंतर गावाकडे आलो. पहातोय तर राजा दावणीला नाही.
आण्णांना विचारलं तर म्हणाले,” आरं, तू गेलास आणि बाईलीच कुणालाच हात लावू दिईना. वैरण आमी लांबूनच घालयचो, आणि पाणी सुदिक लांबूनच दावायचो. पण दावणीतून सोडून कामाला जुपायाची काय आमची हिम्मत हुईना. आखरी त्याच्या मूळ मालकाला सांगावा धाडला. घेतल्या कि मतीला दोन हजार रुपय खोत खावून दिवून टाकला.”त्यानंतर कितीतरी वर्ष सुट्टीला गावी गेलो कि राजाच्या रिकाम्या दावणीकड मी पहायचो आणि त्याच्या माझ्यातलं एक नातं माझ्या मनात गजबजून यायचं.

Subscribe to:
Posts (Atom)